शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धक्कादायक, ऑक्सिजन मास्क काढून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:02 IST

१० टक्के रुग्णांची अवस्था : डेथ ऑडिट कमिटीचे निरीक्षण, उपचाराबरोबर रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आरोग्य यंत्रणेवर वेळ औरंगाबाद : कोरोना ...

१० टक्के रुग्णांची अवस्था : डेथ ऑडिट कमिटीचे निरीक्षण, उपचाराबरोबर रुग्णांवर लक्ष ठेवण्याची आरोग्य यंत्रणेवर वेळ

औरंगाबाद : कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजन खऱ्या अर्थाने प्राणवायू ठरत आहे. पण अनेक रुग्ण आपण चांगले आहोत, ऑक्सिजनची गरज नाही, असा समज करून स्वतःच ऑक्सिजन मास्क काढून टाकत आहेत. जवळपास १० टक्के रुग्ण असा प्रकार करतात. त्यामुळे असे रुग्ण एकप्रकारे मृत्यूलाच आमंत्रण दिले जात आहे. या प्रकारावर घाटीतील डेथ ऑडिट कमिटीची चर्चा करून या परिस्थितीवर अनेक उपाययोजना करून रुग्णांचा मास्क हटणार नाही, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. पण गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या आहे. अशा रुग्णांनी खाटा भरून गेल्या आहेत. उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन लावले जाते. त्यामुळे रुग्णांची प्रकृती सुधारण्यास मदत होते. पण उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांना ऑक्सिजनवरील रुग्णांवर सतत लक्ष ठेवावे लागते आहे. कारण अनेक रुग्ण हा मास्क स्वतः काढून टाकत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराकडे जर थोडेही दुर्लक्ष झाले तर हा प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो.

---

ही आहेत मास्क काढण्याची कारणे

शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असली तरी रुग्ण सामान्य दिसत असतो. श्वास घेण्यास अडथळा होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. वैद्यकीय भाषेत डॉक्टर याला ''हॅप्पी हायपॉक्सिया'' असे म्हणतात. मास्क काढण्यामागे हे एक कारण आहे. मास्कशिवाय चांगले वाटते. पण काही वेळातच रुग्णाची प्रकृती गंभीर होते. आपल्याला काही झाले नाही, उगीच मास्क लावला, असा समज करून रुग्ण मास्क काढून टाकतात.

--

घाटीत सुरू केलेले उपाय

- रुग्णांना मास्क काढल्यावर होणारी ऑक्सिजन पातळी आणि मास्क लावल्यावर वाढणारी ऑक्सिजन पातळी दाखवली जाते.

- मस्कचे महत्त्व, मास्क नाही ठेवला तर संभाव्य धोका रुग्णाला सांगितला जातो.

- रुग्णांचे मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशन करतात.

- नातेवाइकांना रुग्णांना फोन करण्यास सांगून मास्क काढू नका, असे सांगण्याचा सल्ला दिला जातो.

---

---

रुग्ण सहकार्य करीत नाही

उपचारादरम्यान अनेक रुग्ण सहकार्य करीत नाहीत. जवळपास १० टक्के रुग्ण वारंवार मास्क काढून टाकतात. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज असते. पण ते ऑक्सिजन मास्क ठेवत नाहीत.

- डॉ. अनिल जोशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी

---

प्रत्येक रुग्णावर लक्ष

रुग्णांची संख्या वाढली आहे. पण तरीही प्रत्येक रुग्णावर लक्ष दिले जाते. मास्कचे महत्त्व रुग्णांना समजावून सांगितले जाते. नातेवाइकांची मदत घेतली जाते. मास्क काढून ठेवल्याने आतापर्यंत सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.

- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी

---

मास्क परत लावतो

मास्क लावल्यावर रुग्णांना गुदमरल्यासारखे वाटते आणि मास्क काढल्यावर बरे वाटले. हा एक प्रकारे हॅप्पी हायपोक्सियाच आहे. पण ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर रुग्णाला गंभीरता कळते. तेव्हा मास्क परत लावला जातो.

- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक