शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

धक्कादायक; वैजापूर तालुक्यातील २२ गावांतील नागरिकांचे आरोग्य पाण्यामु‌ळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:02 IST

बाबासाहेब धुमाळ वैजापूर : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६५ गावांपैकी ७६ गावांतील पाण्याचे नमुने जून महिन्यात तपासण्यात ...

बाबासाहेब धुमाळ

वैजापूर : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६५ गावांपैकी ७६ गावांतील पाण्याचे नमुने जून महिन्यात तपासण्यात आले. त्यापैकी २२ गावांतील पाण्याची नमुने दूषित आढळून आल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे तपासणीत समोर आले आहे.

मानवी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर पिण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यकच आहे. डोळ्याने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यास योग्यच असते असे नाही. स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये मानवास हानिकारक ठरू शकणारे लाखो जीवजंतू असू शकतात. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आजार डोके वर काढतात. परिणामी आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते.

तालुक्यातील लाडगाव प्रा. आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक पाणी नमुने दूषित आढळून आले. यात नांदगाव, जरूळ, लाख खु., बिलोणी, भऊर व नारायणपूर या गावांचा समावेश आहे. गाढेपिंपळगाव केंद्रांतर्गत चांदेगाव, बाजाठाण, देवगाव शनी, माळी घोगरगाव, शक्ती या गावांचा समावेश आहे. बोरसर केंद्रांतर्गत खिर्डी, बोरसर, भिंगी, पानगव्हाण, परसोडा या गावांतील पाणी दूषित आढ‌ळून आले. शिऊर केंद्रांतर्गत जानेफळ व खंडाळा या गावातील पाणी दूषित आढळून आले. जून महिन्यात वैजापूर शहरातील २० पाणी नमुने घेण्यात आले. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर दोन नमुने दूषित आढळून आले.

----

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

विषमज्वर, काॅलरा, हागवण, अतिसार, पोलिओ, कावीळ, आमांश, आतड्याचे आजार, जंत हे आजार दूषित पाण्यामुळ‌े उद्भवतात.

---

पाणी दूषित होण्याची कारणे : (कोरोनामुळे नमुने घटले, या कॉलमऐवजी ही चौकट वापरावी)

बोअरवेलजवळ शंभर फुटांच्या आत शोषखड्डे अथवा अन्य घाण पाणी असल्यास बोअरवेलमधील पाणी दूषित होऊ शकते.

विहिरीतील पाणी पालापाचोळा पडून किंवा कठडे नसल्याने दूषित होऊ शकते.

पाईपलाईनद्वारे येणारे पाणी हे गळके पाईप, लिकेजमुळे दूषित होऊ शकते.

---

ज्या गावात तपासणीच झाली नाही त्यांचे काय ?

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या काही गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. त्यातील दूषित नमुन्यावरून उपाययोजना केल्या जातील. परंतु, ज्या गावांतील पाणी नमुन्याची तपासणीच झाली नाही, तेथील नागरिकांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना तपासणी, ना उपाययोजना असे म्हणण्याची वेळ त्या गावांवर आली आहे.

---

शुद्ध पाण्यासाठी करा हे उपाय

प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जागृत होऊन स्वत:च उपाययोजना करण्याची गरज आहे.

विहिरीतून किंवा बोअरवेलमधून मिळालेले पाणी उकळूनच प्यावे.

पिण्याची भांडे कायम धुऊन स्वच्छ करावे.

पाण्यात तुरटीचा वापर करावा. घरावरील उंच टाकीत ब्लीचिंग पावडर वापरावी.

ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक विहिरीच्या पाण्यात औषधी व ब्लीचिंग पावडरचा वापर करावा.

----

गावातील नमुने घेतले तपासणीसाठी : ७६

गावातील नमुने आढळले दूषित : २२

---

वैजापूर शहरातील २ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

२० ठिकाणचे नमुने घेतले

२ ठिकाणचे नमुने आढळले दूषित

१८ ठिकाणचे नमुने चांगले आढळले.