शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

दरमहा १०० कोटींचा शॉक

By admin | Updated: June 21, 2017 00:09 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीला दरमहा वीज चोरीचा फटका बसत असून, ११ जिल्ह्यांतून दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान वीज चोरीतून कंपनीला सहन करावे लागत आहे. वीज चोरीला आळा घालणे आणि थकबाकी वसूल करण्याचे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले.अचूक मीटर रीडिंग घेऊन एजन्सीज् वेळेत वीज ग्राहकांना बिले देत नसतील तर रीडिंग घेण्याचे काम आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. जालना जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये कायमस्वरुपी तसेच ३३ वीज वाहिन्यांवरील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांचे प्रमाणदेखील ६०-७० टक्के असून, चालू वीजपुरवठा असलेले फक्त ३०-४० टक्के च ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा न केल्यास वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा त्यांनी दिला. जळगाव परिमंडळातील धुळे मंडळात १९ टक्के व जळगाव मंडळामध्ये २४ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात २७ टक्के वीज गळतीचे प्रमाण आहे. त्यामुळे धुळे मंडळात दरमहा १४ कोटी, नंदुरबार जिल्ह्यात ३६ कोटी, तर धुळे मंडळात साडेबारा कोटी रुपये, असे एकूण ६२ कोटी ४ लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत महसुली तुटीमुळे पायाभूत सुविधांची कामे करणे कठीण होत असून, त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे. बैठकीला सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता बी. के. जनवीर, गणपत मुंडे आदींची उपस्थिती होती.