शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला.

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला. महायुती व काँग्रेस आघाडीमध्ये औरंगाबादेतील लढत तुल्यबळ होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा फोल ठरवत खैरे यांनी दणदणीत विजय मिळविला. खैरे यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध प्रचारासह प्रचार यंत्रणा सतत गतिमान ठेवली. विशेषत: गंगापूर, कन्नड व वैजापूर या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. कन्नडवर लक्ष ठेवण्यासाठी पुत्र ऋषिकेश, वैजापूरसाठी पत्नी वैजयंती खैरे आणि गंगापूरवर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना खास नेमले होते. तिन्ही विधानसभा मतदारसंघांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पाटील यांना त्यांच्या कन्नडमधूनही मताधिक्य मिळू शकले नाही, यातच सर्व आले. शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, भाजपाचा असहकार आणि मतदारसंघाचा विकास करण्यात खैरे अपयशी ठरल्यामुळे मतदारांची नाराजी शिगेला पोहोचलेली होती. त्याचे पडसाद उद्धव ठाकरे यांच्या शहरातील सभेत उमटले. सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे मात्र, खैरे यांनी झटपट चक्रे हलविली. मुंबईहून स्थानीय लोकाधिकार समितीला पाचारण केले. प्रचाराची यंत्रणा नव्याने आखली. पक्षांतर्गत रुसवे फुगवे दूर करून मतदारांना अंतिम टप्प्यात आपल्या बाजूने कुशलतेने वळविण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय रिपब्लिकन नेते व कार्यकर्त्यांना दलित वसाहतींमधून नियोजनबद्ध पद्धतीने फिरविले. हे सर्व घडत असताना मोदीबद्दल मतदारांत वाढलेले आकर्षण खैरे यांनी ‘कॅश’ न केले असते तरच नवल. त्यासाठी खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र होर्डिंग्ज उभारून भाजपासह मतदारांची मने आपल्या बाजूने वळती केली. काँग्रेसचे नितीन पाटील यांनीही उमेदवारी अर्ज सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. ‘व्हिसपर कॅपेंनिंग’ मध्ये पाटील यांनी सुरुवातीला आघाडी घेत, खैरे यांच्यावर मानसिक दडपण वाढविले होते. परंतु हे दडपण पाटील यांना शेवटपर्यंत टिकविता आले नाही. पाटील यांच्या कल्पनेतील मुस्लिम, मराठा व दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा फॅक्टर मूर्त स्वरूप घेऊ शकला नाही. खैरे यांची विजयाची परंपरा चौथ्या वेळेस रोखण्याचे काँग्रेस आघाडीचे मनसुबे मोदी लाटेने धुवून नेले. जिंकल्याचे कारण खैरे यांच्याविरुद्ध मतदारांत ‘अ‍ॅन्टिइन्कबन्सी’ होतीच; परंतु मोदी नावाच्या त्सुनामीचा त्यांनी खुबीने वापर करून घेतला. हरल्याचे कारण प्रचाराची अपुरी यंत्रणा, कार्यकर्त्यांचा अभाव. वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव. मतदारसंघ पिंजून काढण्यात आलेले अपयश. या कारणांमुळे मिळाला विजय 1 खैरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे मतदारसंघातील फीडबॅक मिळत गेला. त्यानुसार नियोजनात अनुरूप बदल करून प्रचार यंत्रणा गतिमानपणे राबविणे त्यांना शक्य झाले. 2 सेनेत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. सोबत महायुतीत आलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांवर योग्य कामे सोपवून ती त्यांनी करवूनही घेतली.