शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला.

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला. महायुती व काँग्रेस आघाडीमध्ये औरंगाबादेतील लढत तुल्यबळ होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा फोल ठरवत खैरे यांनी दणदणीत विजय मिळविला. खैरे यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध प्रचारासह प्रचार यंत्रणा सतत गतिमान ठेवली. विशेषत: गंगापूर, कन्नड व वैजापूर या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. कन्नडवर लक्ष ठेवण्यासाठी पुत्र ऋषिकेश, वैजापूरसाठी पत्नी वैजयंती खैरे आणि गंगापूरवर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना खास नेमले होते. तिन्ही विधानसभा मतदारसंघांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पाटील यांना त्यांच्या कन्नडमधूनही मताधिक्य मिळू शकले नाही, यातच सर्व आले. शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, भाजपाचा असहकार आणि मतदारसंघाचा विकास करण्यात खैरे अपयशी ठरल्यामुळे मतदारांची नाराजी शिगेला पोहोचलेली होती. त्याचे पडसाद उद्धव ठाकरे यांच्या शहरातील सभेत उमटले. सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे मात्र, खैरे यांनी झटपट चक्रे हलविली. मुंबईहून स्थानीय लोकाधिकार समितीला पाचारण केले. प्रचाराची यंत्रणा नव्याने आखली. पक्षांतर्गत रुसवे फुगवे दूर करून मतदारांना अंतिम टप्प्यात आपल्या बाजूने कुशलतेने वळविण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय रिपब्लिकन नेते व कार्यकर्त्यांना दलित वसाहतींमधून नियोजनबद्ध पद्धतीने फिरविले. हे सर्व घडत असताना मोदीबद्दल मतदारांत वाढलेले आकर्षण खैरे यांनी ‘कॅश’ न केले असते तरच नवल. त्यासाठी खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र होर्डिंग्ज उभारून भाजपासह मतदारांची मने आपल्या बाजूने वळती केली. काँग्रेसचे नितीन पाटील यांनीही उमेदवारी अर्ज सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. ‘व्हिसपर कॅपेंनिंग’ मध्ये पाटील यांनी सुरुवातीला आघाडी घेत, खैरे यांच्यावर मानसिक दडपण वाढविले होते. परंतु हे दडपण पाटील यांना शेवटपर्यंत टिकविता आले नाही. पाटील यांच्या कल्पनेतील मुस्लिम, मराठा व दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा फॅक्टर मूर्त स्वरूप घेऊ शकला नाही. खैरे यांची विजयाची परंपरा चौथ्या वेळेस रोखण्याचे काँग्रेस आघाडीचे मनसुबे मोदी लाटेने धुवून नेले. जिंकल्याचे कारण खैरे यांच्याविरुद्ध मतदारांत ‘अ‍ॅन्टिइन्कबन्सी’ होतीच; परंतु मोदी नावाच्या त्सुनामीचा त्यांनी खुबीने वापर करून घेतला. हरल्याचे कारण प्रचाराची अपुरी यंत्रणा, कार्यकर्त्यांचा अभाव. वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव. मतदारसंघ पिंजून काढण्यात आलेले अपयश. या कारणांमुळे मिळाला विजय 1 खैरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे मतदारसंघातील फीडबॅक मिळत गेला. त्यानुसार नियोजनात अनुरूप बदल करून प्रचार यंत्रणा गतिमानपणे राबविणे त्यांना शक्य झाले. 2 सेनेत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. सोबत महायुतीत आलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांवर योग्य कामे सोपवून ती त्यांनी करवूनही घेतली.