शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

घरपट्टी वाढीच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:23 IST

शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नागरिकांना महानगरपालिका ११ पटीने घरपट्टी वाढवून त्यांना तशा नोटिसा देवून दहशत निर्माण करीत आहे़ महानगरपालिकेची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही़ शिवसेनेने आतापर्यंत मनपाला सुधारण्याची संधी दिली होती़ परंतु, सत्ताधाºयांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांमधील दरवाढीची दहशत कमी होत नाही़ त्यामुळे शिवसेनाच आता जनतेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याची माहिती आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली़परभणी येथे आ़ राहुल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी बोलताना ते म्हणाले की, महानगरपालिकेने नागरिकांना घरपट्टी वाढी संदर्भात नोटिसा दिल्या आहेत़ त्यामध्ये घरपट्टी वाढीचे दर ११पटीने वाढविले आहेत़ परिणामी स्वत:च्याच घरात राहणाºया नागरिकांना या दरवाढीमुळे किरायाच्या घरात राहतो की काय अशी भीती वाटू लागली आहे़ मनपाकडून शहरात एका महिन्यात केवळ तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो़ स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे़ शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून न देता सत्ताधाºयांच्या तुमड्या भरण्यासाठी नागरिकांकडून घरपट्टीच्या नावाखाली कर वसुली केली जात आहे़ सर्वसामान्यांना त्रास देवून व दहशत पसरवून वसूल केल्या जाणाºया घरपट्टीला शिवसेनेचा कडाडून विरोध आहे़ यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल़ शिवाय शासनाकडे याबाबत दाद मागू़ वेळप्रसंगी न्यायालयातही धाव घेतली जाईल, असा इशाराही यावेळी आ़पाटील यांनी दिला़ शासनाने २००८ पर्यंत विना परवाना झालेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असतानाही मनपा गेल्या २५ वर्षांपासूनची घरपट्टी दंडासह वसूल करण्याचा तगादा लावत आहे़ त्यामुळे मनपाने दिलेली नोटीसच गैरकायदेशीर असून, ती रद्द झाली पाहिजे, असेही आ़ पाटील म्हणाले़ यासाठी जनतेमध्ये जाऊन जनजागृती करणार असून, यापुढील काळात शिवसेना स्टाईलने शहरात आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला़ शहरात अतिक्रमण हटवितानाही मनपाकडून पक्षपाती धोरण अवलंबिले जात असल्याचे ते म्हणाले़ शिवसेनेकडून आगामी काळात महारोजगार मेळावा घेतला जाणार असून, महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे़ शिवाय सामूहिक विवाह सोहळ्याचेही फेब्रुवारी महिन्यात आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, सदाशिव देशमुख, संजय घाडगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे आदींची उपस्थिती होती़