शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळी कुठे कमी, कुठे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:02 IST

दीडपट पुरवठ्यास परवानगी : रोज ३३०० जणांचे पोट भरते बाकीच्यांचे काय विकास राऊत औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ...

दीडपट पुरवठ्यास परवानगी : रोज ३३०० जणांचे पोट भरते बाकीच्यांचे काय

विकास राऊत

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या पोटाला आधार म्हणून देण्यात येत असलेल्या शिवभोजन थाळीचा पुरवठा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश केंद्रांवर कमी-अधिक थाळ्यांचा पुरवठा हाेत असल्यामुळे १० ते २० जणांना थाळीविना परत जावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही काही जणांना थाळी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. या सगळ्या परिस्थितीवर कोटा वाढविण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे.

शहरात एकूण ११ शिवभोजन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात १३ केंद्रे आहेत. शहरात १६०० थाळ्यांना, तर ग्रामीण भागात १७०० थाळ्यांचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण ३३०० थाळ्या रोज वाटप हाेत असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. आजवर सव्वातीन लाख थाळ्यांचे वाटप झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन केंद्रे

२४

ग्रामीण भागातील केंद्रे

१३

शहरातील एकूण केंद्रे

११

शहरातील लाभार्थी संख्या

११००

रोजच्या थाळ्यांची लाभार्थी संख्या

३३००

दररोज १० ते २० जणांना मिळत नाही थाळी

शहरातील शिवभोजन केंद्रांवर कुठे जास्त, तर कुठे कमी थाळ्या मिळण्याची परिस्थती आहे. काही ठिकाणी लाभार्थी रांगेत उभे राहूनही त्यांना भोजन मिळत नाही, त्यांना उपाशी परतावे लागते. यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत सहायक पुरवठा अधिकारी दत्ता बारस्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, इष्टांक (थाळ्यांचा आकडा) दीडपट केला आहे. जिल्ह्याला २ लाखांची मर्यादा आहे. पुरवठा संख्या वाढली तरी शासनाकडून मंजुरी घेऊन अनुदान देण्यात येईल. एक-दोन ठिकाणी कमी पडण्याचे प्रमाण आहे; परंतु रांगेतील प्रत्येकाला थाळी द्यावीच लागेल, अशी सूचना केंद्र चालकांना करण्यात आली आहे.

(डमी ९६९)

बसस्थानक : बसस्थानकावर गर्दी वाढत असल्याने शिवभोजन केंद्रावर थाळ्या कमी पडतात. रांगेत राहूनही ७ ते ८ जणांना थाळी मिळत नाही.

घाटी : येथील केंद्रावर थाळ्या कमी पडल्या तरी तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात येते. घाटी असल्यामुळे येथे दिवसभर ही सेवा सुरू असते.

रेल्वेस्टेशन : रेल्वेस्टेशन येथे शासनाने ठरवून दिलेल्या कोट्याच्या पुढे थाळ्यांचे वाटप होते. कमी पडण्यासारखी परिस्थिती येथे निर्माण होत नाही.