शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

शिवसेनेकडून दररोज ९ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 5, 2016 00:23 IST

लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.

पक्ष प्रमुखांच्या हस्ते शुभारंभ : ५० टँकरच्या दररोज दीडशे फेऱ्या...लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. ५० टँकरच्या प्रत्येकी तीन फेऱ्या याप्रमाणे दररोज दीडशे फेऱ्या करून ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वी दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता त्यात ४० टँकरची वाढ केली असल्याची माहिती यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.लातूर शहर व जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मनपाकडून १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवसेनेकडूनही दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. बुधवारपासून त्यात टँकरची वाढ करण्यात आली आहे. ४० टँकरची अतिरिक्त वाढ केल्याने आता ५० टँकरने शिवसेनेकडून पाणीपुरवठा होणार आहे. दररोज ९ लाख लिटर्स पाणी नागरिकांना वितरण करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे असल्याचे संपर्क प्रमुख सावंत यांनी सांगितले. लातूर शहरात कचऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, जागोजागी कचरा साचतो आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रत्येक प्रभागात कचरा कुंड्या देण्याचे नियोजन केले आहे. प्रारंभी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या नऊ प्रभागांत कचरा कुंड्या देण्यात येणार आहेत. त्याचाही प्रारंभ बुधवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना नगरसेवक असलेल्या प्रभागांत कचरा कुंड्या दिल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागांत कचरा कुंड्या दिल्या जाणार आहेत. स्वच्छ शहर, सुंदर शहर... ही संकल्पना शहराची आहे. परंतु, डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात कचरा साचत आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वरवंटी येथील कचरा डेपो परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले असून, मनपा प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत. परंतु, शिवसेनेच्या वतीने कचरा रस्त्यावर दिसू नये म्हणून शिवाय कचरा उचलण्यास सोपे जावे म्हणून कचरा कुंड्या दिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक टाकी देण्याचे नियोजन केले असून, त्याचाही शुभारंभ पक्ष प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. तीन हजार लिटर्स क्षमतेच्या या टाक्यांचे ग्रामपंचायतींकडे लोकार्पण केले असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी...लातूर जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. यंदा तर तीव्र पाणीटंचाई आहे. दोन महिन्यांपासून नळाला पाणी बंद आहे. शासन व प्रशासन त्यांच्या पातळीवर पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न करीत आहे. शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत पाणी वितरणासाठी ५० टँकरची सोय करून दररोज ९ लाख लिटर्स पाणी वाटप केले जाणार आहे.