शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

शिवसेना, भाजपचे एकला चलो रे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:54 IST

स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायत हा सत्तेतील शेवटचा दुवा. या सत्तेतून जनाधार वाढवत आपली व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न होत असतो. ज्या पक्षाच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती, तो पक्ष प्रबळ मानला जातो. हेच सूत्र अवलंबत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठका घेत ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या काळात आॅक्टोबर हीटबरोबरच राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील ग्रामपंचायतींचे परावलंबित्व कमी करत विकास कामांचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. म्हणूनच शेवटच्या स्तरावरील सत्ता आपल्याकडेच असावी, असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भाजपने बैठका घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत. निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार करीत अधिकाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या नेत्यांनी ठेवले आहे.गत काही महिन्यांत भाजपने पक्षविस्तार करत कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला असून, ग्रामीण भागात आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प.सदस्य राहुल लोणीकर यांनी ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून, ग्रामीण भागात पक्ष रुजविण्याची ही नामी संधी साधण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे.किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. जालन्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत नेत्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून, ग्रामीण भागात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली असून, शिवसैनिकांना ‘चार्ज’ केले जात आहे.शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढत शिवसेना नेत्यांनी भाजपला कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना आखली आहे.आपापले पारंपरिक गड राखण्यासोबत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांचे गड कायम राहतात की याला सुरुंग लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोणत्या पक्षाला ‘आॅक्टोबर हीट’ चा फटका बसतो, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.