शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शिवसेना, भाजपचे एकला चलो रे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:54 IST

स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायत हा सत्तेतील शेवटचा दुवा. या सत्तेतून जनाधार वाढवत आपली व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न होत असतो. ज्या पक्षाच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती, तो पक्ष प्रबळ मानला जातो. हेच सूत्र अवलंबत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने कंबर कसली आहे. तर शिवसेनेनेही तालुकास्तरावर बैठका घेऊन राजकीय वातावरण तापवले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठका घेत ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या काळात आॅक्टोबर हीटबरोबरच राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील ग्रामपंचायतींचे परावलंबित्व कमी करत विकास कामांचा निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. म्हणूनच शेवटच्या स्तरावरील सत्ता आपल्याकडेच असावी, असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यानुसार भाजपने बैठका घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत. निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार करीत अधिकाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या नेत्यांनी ठेवले आहे.गत काही महिन्यांत भाजपने पक्षविस्तार करत कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला असून, ग्रामीण भागात आपली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प.सदस्य राहुल लोणीकर यांनी ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून, ग्रामीण भागात पक्ष रुजविण्याची ही नामी संधी साधण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे.किंबहुना आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. जालन्यात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत नेत्यांनी तशी भूमिका जाहीर केली आहे. पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून, ग्रामीण भागात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली असून, शिवसैनिकांना ‘चार्ज’ केले जात आहे.शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढत शिवसेना नेत्यांनी भाजपला कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना आखली आहे.आपापले पारंपरिक गड राखण्यासोबत जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांचे गड कायम राहतात की याला सुरुंग लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोणत्या पक्षाला ‘आॅक्टोबर हीट’ चा फटका बसतो, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.