शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

जिल्ह्यातील १४३५ पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीने ९ ते १९ मे दरम्यान औरंगाबाद परिमंडळातील सुमारे ९०० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे. ५७ कोटी ९३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी कंपनीने पाणीपुरवठा योजनांना कारवाईचा शॉक दिला आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांबाबत जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंचांवर जबाबदारी टाकून हात वर केले आहेत, तर महावितरण कंपनीने व्याज व दंडाची रक्कम वगळता मूळ वीज बिल भरले तरच वीजपुरवठा सुरळीत करण्याची भूमिका घेतल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले, जि. प. सीईओंना भेटून वीज बिलांची मागणी केली होती. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बिल देण्यासाठी त्यांना मागणी केली; परंतु त्यांनी आमच्या मूळ वीज बिल मागणीकडे जि. प. सीईओंनी लक्ष दिले नाही.बहुतांश ग्रामपंचायतींनी वीज बिलाची रक्कम भरलेली नाही. २३७७ कनेक्शन दोन जिल्ह्यांत आहेत. त्यातील १२६ योजनांनी वीज बिल भरले, तर १४३५ कनेक्शनचे वीज बिल कापण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित असतानाही काही पाणीपुरवठा योजना सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. नवीन कनेक्शन घेऊन त्या योजना सुरू आहेत काय, त्याकडेही कंपनी लक्ष देत आहे. ४३१ औरंगाबाद आणि १००४ जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना बंद आहेत. ५७ कोटींच्या थकबाकीमध्ये १९ कोटींचे व्याज असल्याचे त्यांनी नमूद केले.