शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाठ सोडेना

By admin | Updated: April 14, 2015 00:39 IST

जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.जालना तालुक्यातील सेवली, नेर, रामनगर, हडप, सावरगाव, दरेगाव, राममूर्ती, इंदेवाडी, जामवाडी या भागात दुपारी ४ वाजेनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परतूर तालुक्यातील वाटूर, आंबा, आष्टी, केंधळी, श्रीष्टी, हातडी इत्यादी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव परिसरातही गारपिट झाली. गारांचा आकार हरभऱ्याएवढा होता. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सेवली, सावरगाव भागडे, पाष्टा, सोनदेव, एरंडवडगाव, वरखेड यासह अनेक गावांमध्ये गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनावरांना लागणाऱ्या शाळू ज्वारीचा कडबा पूर्णपणे काळा झाला आहे. सेवली परिसरात हळदीच्या पिकाचेही पावसाने नुकसान झाले आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राजूर, हसनाबाद, केदारखेडा, दानापूर, आन्वा, इब्राहिमपूर, लिंगेवाडी इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या वादळासह गारपिट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू (ज्वारी), मका, कांदा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)