शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ दोन एकर जमीन शासनजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:47 IST

तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे.हिंगोली तालुक्यातील बळसोंड शिवारात गट क्र.१२ मधील सदर जमिनीबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात शर्तभंग झाल्याने त्याची चौकशी करून ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला होता. त्यानंतर बराच काळ लोटल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला की काय, असे वाटत होते. मात्र आता यापैकी ८0 आर जमिनीचे क्षेत्रफळ महाराष्ट्र शासनाच्या नावे करण्याचा आदेश हिंगोलीच्या तहसीलदारांनी १६ जून २0१७ रोजी दिला होता. यात मौजे बळसोंड येथील केशव शेषराव गवळी यांच्या नावावरील ९ हेक्टर ६0 आर पैकी ८0 आर. जमिनीचा शर्तभंग झाल्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार ही जमीन शासन ताब्यात घेवून सातबारावर महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्याचा आदेश दिला होता. संबंधितांना नोटिसा बजावून ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार व मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांनी फेर मंजूर केला. बळसोंड सज्जाचे तलाठी गजानन पारिसकर यांनी सातबाराही निर्गमित केला आहे. पोदार शाळेच्या परिसराची ही जागा असल्याचे सांगितले जात असल्याने खळबळ उडाली आहे.