शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

‘ती’ दोन एकर जमीन शासनजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:47 IST

तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बळसोंड शिवारातील जमिनीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार कारवाई सुरू असून एकूण जमिनीपैकी २ एकर जमीन शासनजमा झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी त्याचा फेरही करण्यात आला आहे.हिंगोली तालुक्यातील बळसोंड शिवारात गट क्र.१२ मधील सदर जमिनीबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात शर्तभंग झाल्याने त्याची चौकशी करून ही जमीन शासनजमा करण्याचा आदेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला होता. त्यानंतर बराच काळ लोटल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला की काय, असे वाटत होते. मात्र आता यापैकी ८0 आर जमिनीचे क्षेत्रफळ महाराष्ट्र शासनाच्या नावे करण्याचा आदेश हिंगोलीच्या तहसीलदारांनी १६ जून २0१७ रोजी दिला होता. यात मौजे बळसोंड येथील केशव शेषराव गवळी यांच्या नावावरील ९ हेक्टर ६0 आर पैकी ८0 आर. जमिनीचा शर्तभंग झाल्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार ही जमीन शासन ताब्यात घेवून सातबारावर महाराष्ट्र शासन अशी नोंद घेण्याचा आदेश दिला होता. संबंधितांना नोटिसा बजावून ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार व मंडळ अधिकारी शेख अल्लाबक्ष यांनी फेर मंजूर केला. बळसोंड सज्जाचे तलाठी गजानन पारिसकर यांनी सातबाराही निर्गमित केला आहे. पोदार शाळेच्या परिसराची ही जागा असल्याचे सांगितले जात असल्याने खळबळ उडाली आहे.