शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘ती’ चार अल्पवयीन मुले कुटुंबियांकडे सुखरुप परतली

By admin | Updated: June 13, 2017 23:39 IST

परभणी : शहरातील साखला प्लॉट भागातून रविवारी सकाळी गायब झालेली चार मुले रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पुन्हा कुटुंबियांकडे सुखरुप परतली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील साखला प्लॉट भागातून रविवारी सकाळी गायब झालेली चार मुले रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पुन्हा कुटुंबियांकडे सुखरुप परतली आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.येथील परळी रेल्वे गेट भागातील साखला प्लॉट येथे वास्तव्यास असलेली चार मुले घरातून गायब झाली होती. त्यामुळे दिवसभर अन्सारी आणि रहेमान हे कुटुंबीय मुलांचा शोध घेत होते. मुले सापडत नसल्याने कुटुंबीय सकाळपासूनच चिंतेत पडले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर चार मुले भटकत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. रेल्वे पोलिसांनी या मुलांना बोलावून त्यांचे नाव व संपूर्ण पत्ता विचारला. त्यातील एका मुलीने सांगितलेल्या भ्रमणध्वनीवरुन मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या पालकांना रेल्वेस्थानकावर बोलावून घेतले तेव्हा ती त्यांचीच मुले असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एजान अन्सारी (वय दीड), नजिया (१०), तब्बू (९) आणि सानिया (८) या चारही मुलांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी रेल्वे पोलीस हवालदार शफीयोद्दीन शेख, राम कातकडे, गजानन धायडे, महिला पोलीस कर्मचारी पूजा आगाशे, अन्सावली शेफीयार यांनी केली. दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालकांना त्यांची हरवलेली मुले परत मिळाली असून, रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.