शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनास्थेतून ‘शतकोटी’ला घरघर

By admin | Updated: July 23, 2014 00:21 IST

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली असून, रोपच उपलब्ध होत नसल्याने शतकोटीची संकल्पानाच मोडीत निघत असल्याचा प्रकार जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे. वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व वृक्षलागवड वाढावी यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रारंभी चांगले काम करण्यात आले; परंतु कामातील सातत्य टिकविण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याने या योजनेला घरघर लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात २ लाख ४९ हजार ४६९, वसमत तालुक्यात २ लाख ३८ हजार ५, हिंगोली तालुक्यात ४२ हजार ५९०, कळमनुरी तालुक्यात २ लाख ४८ हजार ४३३ आणि सेनगाव तालुक्यात २ लाख ११ हजार ३६० रोपांची लागवड केल्याचा अहवाल शासनदरबारी आहे. हा कागदोपत्री अहवाल असला तरी आजघडीला यामधील किती रोपे जिवंंत आहेत? हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीची ही मोहीम कागदावरच राबविली. त्यांचे पितळ उघड पडेल अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे; परंतु याकडे मात्र सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले. परिणामी लाखांवर लावलेली रोपे आजघडीला हजारातही सापडतील की नाही? याविषयी साशंकता आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केल्याचा अहवाल जिल्हास्तरीय यंत्रणेचा असला तरी चालूवर्षी मात्र अत्यंत वाईट अवस्था या योजनेची असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्याला ५ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक तालुक्याने १ लाखाचा वाटा उचलायचा आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्याप वृक्षारोपणाची मोहीम सुरू झालेली नाही. सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोप- वाटिकांमध्ये एकूण ६ लाख रोपे उपलब्ध आहेत. हीच रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत; परंतु ती कधी देण्यात येतील, याचा मुहूर्त मात्र अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या योजनेसंदर्भात किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते. गतवर्षी ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड आणि यावर्षी मात्र ५ लाखांचे उद्दिष्ट या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. रोप वाटिकांमध्ये रोपच उपलब्ध नसल्याने यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही घटले आहे. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त रोपे लावण्याची जबाबदारी आहे तरी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रोपांची लागवड करण्यात आलेली नाही. कारण गेल्या ३ वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींनी रोपे तयार केली होती, त्यांची रोपे एक तर खरेदी केली गेली नाहीत व ज्यांची रोपे खरेदी केली गेली त्यांना मोबदला वेळेवर दिला गेला नाही. त्यामुळेच या रोपवाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे समजते. (जिल्हा प्रतिनिधी)अद्यापही वृक्षलागवड सुरू नाही गतवर्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची करण्यात आली होती लागवड.लाखांवर रोपांची लागवड केली असली तरी या रोपांचे संवर्धन करण्यात आले नसल्याने सध्या जिवंत रोपांची संख्या कमीच.चालू वर्षी रोपांची उपलब्धता कमी असल्याने जिल्ह्याचे केवळ ५ लाख रोप लागवडीचे ‘शतकोटी’ उद्दिष्ट.सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमधून जिल्हा परिषद घेणार रोपे.गेल्या ३ वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने उभारली नाही रोपवाटिका.३ वर्षांपूर्वी जि.प.ने सांगितलेल्या रोपांची बिले करण्यात आली नव्हती अदा.