शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनास्थेतून ‘शतकोटी’ला घरघर

By admin | Updated: July 23, 2014 00:21 IST

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली

हिंगोली : पर्यावरण वाढीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शतकोटी वृक्ष -लागवड योजनेला प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे घरघर लागली असून, रोपच उपलब्ध होत नसल्याने शतकोटीची संकल्पानाच मोडीत निघत असल्याचा प्रकार जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे. वाढत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून व वृक्षलागवड वाढावी यासाठी शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रारंभी चांगले काम करण्यात आले; परंतु कामातील सातत्य टिकविण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याने या योजनेला घरघर लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात २ लाख ४९ हजार ४६९, वसमत तालुक्यात २ लाख ३८ हजार ५, हिंगोली तालुक्यात ४२ हजार ५९०, कळमनुरी तालुक्यात २ लाख ४८ हजार ४३३ आणि सेनगाव तालुक्यात २ लाख ११ हजार ३६० रोपांची लागवड केल्याचा अहवाल शासनदरबारी आहे. हा कागदोपत्री अहवाल असला तरी आजघडीला यामधील किती रोपे जिवंंत आहेत? हा एक संशोधनाचा विषय ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीची ही मोहीम कागदावरच राबविली. त्यांचे पितळ उघड पडेल अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे; परंतु याकडे मात्र सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले. परिणामी लाखांवर लावलेली रोपे आजघडीला हजारातही सापडतील की नाही? याविषयी साशंकता आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केल्याचा अहवाल जिल्हास्तरीय यंत्रणेचा असला तरी चालूवर्षी मात्र अत्यंत वाईट अवस्था या योजनेची असल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्याला ५ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक तालुक्याने १ लाखाचा वाटा उचलायचा आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्याप वृक्षारोपणाची मोहीम सुरू झालेली नाही. सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोप- वाटिकांमध्ये एकूण ६ लाख रोपे उपलब्ध आहेत. हीच रोपे ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत; परंतु ती कधी देण्यात येतील, याचा मुहूर्त मात्र अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या योजनेसंदर्भात किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते. गतवर्षी ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची लागवड आणि यावर्षी मात्र ५ लाखांचे उद्दिष्ट या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. रोप वाटिकांमध्ये रोपच उपलब्ध नसल्याने यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही घटले आहे. त्यामुळे रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त रोपे लावण्याची जबाबदारी आहे तरी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये रोपांची लागवड करण्यात आलेली नाही. कारण गेल्या ३ वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींनी रोपे तयार केली होती, त्यांची रोपे एक तर खरेदी केली गेली नाहीत व ज्यांची रोपे खरेदी केली गेली त्यांना मोबदला वेळेवर दिला गेला नाही. त्यामुळेच या रोपवाटिका बंद करण्यात आल्या असल्याचे समजते. (जिल्हा प्रतिनिधी)अद्यापही वृक्षलागवड सुरू नाही गतवर्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ लाख ८९ हजार ८५७ रोपांची करण्यात आली होती लागवड.लाखांवर रोपांची लागवड केली असली तरी या रोपांचे संवर्धन करण्यात आले नसल्याने सध्या जिवंत रोपांची संख्या कमीच.चालू वर्षी रोपांची उपलब्धता कमी असल्याने जिल्ह्याचे केवळ ५ लाख रोप लागवडीचे ‘शतकोटी’ उद्दिष्ट.सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या रोपवाटिकांमधून जिल्हा परिषद घेणार रोपे.गेल्या ३ वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने उभारली नाही रोपवाटिका.३ वर्षांपूर्वी जि.प.ने सांगितलेल्या रोपांची बिले करण्यात आली नव्हती अदा.