शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

औरंगाबादमध्ये शांतिगिरी महाराज उतरणार निवडणूक रिंगणात, चंद्रकांत खैरेंचा मार्ग होणार बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 09:38 IST

गेली अनेक वर्ष औरंगाबादच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पुढची लोकसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते.

ठळक मुद्देवेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा औरंगाबादमध्ये मोठा भक्त परिवार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात शांतिगिरी महाराजांना मानणारे लाखो अनुयायी आहेत.

औरंगाबाद - गेली अनेक वर्ष औरंगाबादच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पुढची लोकसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते. कारण पुढच्या निवडणुकीत खैरे यांच्यासमोर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचे आव्हान असणार आहे. भक्तांच्या इच्छेखातर आपण पुढची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे शांतिगिरी महाराजांनी म्हटले आहे. 

वेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा औरंगाबादमध्ये मोठा भक्त परिवार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात शांतिगिरी महाराजांना मानणारे लाखो अनुयायी आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक खैरे यांच्यासाठी सोपी असणार नाही. शिवसेना आणि भाजपामध्ये आता सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. 

दोन्ही पक्षांची स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून विविध मतदारसंघात सक्षम उमेदवारांचा शोध सुरु आहे. शांतिगिरी महाराजांच्या रुपाने भाजपाकडे एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून संधी मिळू शकते. अन्यथा ते अपक्ष निवडणूक रिंगणात उतरतील. 2009 साली शांतिगिरी महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण अपक्ष लढूनही त्यांना 1 लाख 48 हजार 26 मते मिळाली होती.                                                                           

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरे