शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शांती मार्चने दणाणले शहर

By admin | Updated: December 22, 2015 00:13 IST

औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे

औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे अतिक्रमण समजून ती पाडण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी आज सोमवारी तमाम आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गाने निघालेल्या जवळपास ४० ते ५० हजार नागरिकांच्या शांती मार्चने संपूर्ण शहर दणाणून गेले. जालना रोडसह शहरातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील बुद्धविहारे बचाव, असा नारा देत दलित अत्याचार विरोधी सर्वपक्षीय कृती समिती व भिक्खू संघ यांच्या विद्यमाने सोमवारी शांती मार्चचे आयोजन केले होते. यासंदर्भात कृती समितीच्या सदस्यांनी मागील काही दिवसांपासून दलित वस्त्या, बुद्धविहारांमध्ये बैठका घेऊन या शांती मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला संपूर्ण शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रक, मिनी बस, जीप, टेम्पो, कार अशा मिळेल त्या वाहनातून आंबेडकर अनुयायांचे जथेच्या जथे क्रांतीचौकात येत होते. त्यामुळे क्रांतीचौकापासून सोमवारी सकाळी ११.३० वाजता निघणारा हा शांती मार्च अखेर दुपारी १ वाजता सुरू झाला. भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, भदन्त डॉ. एम. सत्यपाल, भदन्त नागसेन व भिक्खू संघाने बुद्धवंदना पठण केल्यानंतर नियोजित शांती मार्च पुढे निघाला. जसजसा हा शांती मार्च पुढे जात होता तसतसे नागरिकांचे जथे सहभागी होत गेले.