शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रक्षा बंधनावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST

हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली.

हिंगोली : बहीण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधनाचा सण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; परंतु यंदा दुष्काळाची छाया जिल्ह्यावर असल्याने बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. परिणामी दरवर्षी नागपंचमीपासून बाजारात दिसणारी गर्दी आणि लखलखाट पहावयास मिळत नाही. १० आॅगस्ट रोजी देशभर हा सण साजरा होईल. मराठवाड्यात लोक या सणापासून थोडे लांबच असल्याने हिंगोलीचे चित्र वेगळे नाही. जिल्ह्याची इकॉनामी शेतीवर अवलंबून असल्याने यंदा पिकांची अवस्था बिकट आहे. उशिरा पेरणी झाल्यामुळे उत्पादनात घट होईल. दरम्यान पावसातही अनियमितता व अनिश्चिता असल्याने अधिक खर्च करण्यासाठी शेतकरी हात आखडता घेत आहेत. परिणामी बाजाराच्या उलाढालीवर फटका बसल्याने व्यापाऱ्यांना हातावर हातावर हात धरून बसावे लागत आहे. प्रतिवर्षी नागपंचमीपासून राख्यांचे विविध ठिकाणी दुकाने लागलेले दिसतात. रस्त्यांवरील गाड्यांवरही राख्या विकणाऱ्यांची संख्या लक्षणिय असते. चार दिवसांवर सण आला असताना गतवर्षीचे चित्र दिसत नाही. राख्यांसाठी महिलांना दुकाने शोधावे लागतात. पीकपरिस्थिती पाहता व्यापाऱ्यांनी देखील राख्या विक्रीसाठी आणल्या नाहीत. अगदी मोजके दुकाने हिंगोलीत आढळतात. त्यावर व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसतात. दिवसभरात मोजता येतील एवढेच ग्राहक खरेदीसाठी येतात. काही व्यापाऱ्यांनी गुंतविलेले पैसे यंदा निघण्याची शक्यता कमी आहे. मागील ३१ वर्षांपासून पहिल्यांदा विपरित चित्र असल्याचे विक्रेता तरूण जयस्वाल यांनी सांगितले. आकर्षक राख्या बाजारातबाजार थंड असला तरी हिंगोलीत विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी, दोरी, जरी, रेशम प्रकारातील राख्यांची सध्या चलती आहे. किमान १ रूपयांपासून ४० रूपयांपर्यंत या राखीची किंमत आहेत. दुसरीकडे स्टोन राख्यांची किंमत अधिक असल्याने ५० ते १०० रूपयांपर्यंत ग्राहकांना पैसे मोजावे लागतात. चमकदार स्टोनमुळे या राख्यांची किमती वाढल्या आहेत. पूर्वी स्पंजच्या राख्यांनी हात भरून दिसत होता. दूरवरून या राख्या दृष्टीस पडत होत्या. पण या राख्या इहितास जमा होण्याचा मार्गावर आहेत. उलट जितक्या लहान असेल तितकी अधिक पसंती ग्राहकांची लाभते. विक्रेत्यांनी त्याचा विचार करून नाजूक, लहान आकाराच्या राख्या मागविल्या असल्याचे शेख जमीर यांनी सांगितले. प्रथमच गणपती, स्वास्तीक, ओम चिन्हाच्या राख्या बाजारात आल्या आहेत.