शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

पुंजाराम शेरे ,शेवगा सुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.

पुंजाराम शेरे ,शेवगासुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. आता पुन्हा दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिसरात पाऊस नसल्याने मजुरांना काम मिळत नाही. अनेक तरुण रानावनात भटकंती करुन लिंबोळी वेचून त्यावर प्रपंच चालवित आहेत. येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न बिकट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल असताना खरिपातही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ही नगदी पिके हातची गेली. रबी हंगामाचा डोलारा असलेला खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीची सोय करणे जिकिरीचे झाले आहे. रबीसोबतच दैनंदिन व्यवहार चालविण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. या सर्व बाबींचे निरीक्षण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करुन अंबड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर शेळके, शंकर शेळके, मधुकर वाघ, कुंडलिक राघवन, दत्ता राऊत, मनोहर खरात, ज्ञानेश्वर तिकांडे, श्याम तिकांडे, बंडू खोरे, रामनाथ खरात, कारभारी शेळके, नवनाथ शेरे, शिवाजी वाघ, सचिन अटकर आदींनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करातालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढावेत अशी मागणी होत आहे. पावसाअभावी पीकपाणी हातचे गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नच बिकट झालेला आहे. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे तोंड कसे बंद करावे, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी जावे लागते. वह्या-दप्तरासोबतच शाळेचे शुल्क आणि इतर खर्चाची जुळावा जुळव करताना जनतेच्या नाकीनऊ येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.