शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

पुंजाराम शेरे ,शेवगा सुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.

पुंजाराम शेरे ,शेवगासुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. आता पुन्हा दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिसरात पाऊस नसल्याने मजुरांना काम मिळत नाही. अनेक तरुण रानावनात भटकंती करुन लिंबोळी वेचून त्यावर प्रपंच चालवित आहेत. येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न बिकट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल असताना खरिपातही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ही नगदी पिके हातची गेली. रबी हंगामाचा डोलारा असलेला खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीची सोय करणे जिकिरीचे झाले आहे. रबीसोबतच दैनंदिन व्यवहार चालविण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. या सर्व बाबींचे निरीक्षण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करुन अंबड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर शेळके, शंकर शेळके, मधुकर वाघ, कुंडलिक राघवन, दत्ता राऊत, मनोहर खरात, ज्ञानेश्वर तिकांडे, श्याम तिकांडे, बंडू खोरे, रामनाथ खरात, कारभारी शेळके, नवनाथ शेरे, शिवाजी वाघ, सचिन अटकर आदींनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करातालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढावेत अशी मागणी होत आहे. पावसाअभावी पीकपाणी हातचे गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नच बिकट झालेला आहे. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे तोंड कसे बंद करावे, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी जावे लागते. वह्या-दप्तरासोबतच शाळेचे शुल्क आणि इतर खर्चाची जुळावा जुळव करताना जनतेच्या नाकीनऊ येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.