शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

पुंजाराम शेरे ,शेवगा सुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.

पुंजाराम शेरे ,शेवगासुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. आता पुन्हा दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिसरात पाऊस नसल्याने मजुरांना काम मिळत नाही. अनेक तरुण रानावनात भटकंती करुन लिंबोळी वेचून त्यावर प्रपंच चालवित आहेत. येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न बिकट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल असताना खरिपातही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ही नगदी पिके हातची गेली. रबी हंगामाचा डोलारा असलेला खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीची सोय करणे जिकिरीचे झाले आहे. रबीसोबतच दैनंदिन व्यवहार चालविण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. या सर्व बाबींचे निरीक्षण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करुन अंबड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर शेळके, शंकर शेळके, मधुकर वाघ, कुंडलिक राघवन, दत्ता राऊत, मनोहर खरात, ज्ञानेश्वर तिकांडे, श्याम तिकांडे, बंडू खोरे, रामनाथ खरात, कारभारी शेळके, नवनाथ शेरे, शिवाजी वाघ, सचिन अटकर आदींनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करातालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढावेत अशी मागणी होत आहे. पावसाअभावी पीकपाणी हातचे गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नच बिकट झालेला आहे. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे तोंड कसे बंद करावे, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी जावे लागते. वह्या-दप्तरासोबतच शाळेचे शुल्क आणि इतर खर्चाची जुळावा जुळव करताना जनतेच्या नाकीनऊ येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.