शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात भीषण पाणीटंचाई; चाकूरच्या वॉटर पार्कमध्ये उधळपट्टी !

By admin | Updated: April 14, 2016 01:06 IST

संदीप अंकलकोटे , चाकूर लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की

संदीप अंकलकोटे , चाकूरलातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की लातूर शहरावर असताना चाकूर येथील वृंदावन वॉटर पार्कमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी राजरोस सुरू आहे. स्वत:च्या मालकीच्या बंधाऱ्यातून पार्कला पाणी वापरले जात असले, तरी तहानलेल्यांना ते मिळत नाही. व्यवसायासाठी या पाण्याचा वापर राजरोसपणे होत आहे.चाकूर येथे वृंदावन अ‍ॅम्युजमेंट वॉटर पार्क आहे. या वॉटर पार्कचा परिसर दोन एकरच्या आसपास असून, पाण्याचे मोठे तीन हौद आहेत. ९ ते १० हजार लिटर्स क्षमतेचा हा वॉटर पार्क असून, स्वत:च्या बंधाऱ्यातील पाणी वॉटर पार्कसाठी वापरले जाते. एकूण ५ बंधारे आहेत. त्यात पाणी साठवून ठेवलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी न देता वॉटर पार्कसाठी वापरले जाते. दररोज शेकडो पर्यटक या पार्कला भेटी देतात. बुधवारी २५ ते ३० पर्यटकांनी वॉटर पार्कचा आनंद लुटला. गेल्या आठ दिवसांत ५०० ते ७०० पर्यटकांनी भेटी देऊन वॉटर पार्कमधील पाणी खेळण्यासाठी वापरले. दिवसाला ३०० रुपये तिकीट वृंदावन अ‍ॅम्युजमेंट वॉटर पार्कसाठी आकारले जाते. या वॉटर पार्कसाठी किमान ८ ते १० हजार लिटर्स पाणी वापरले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. लातूर शहर व चाकूर तालुकाही टंचाईत होरपळला जात असताना वॉटर पार्कमध्ये मात्र बेसुमार पाण्याचा वापर केला जात आहे. चाकूर तालुक्यातील नदी, विहिरी, पाझर तलाव व सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीतही वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्याचा वापर बेसुमार होत आहे. चाकूर तालुक्यातील सध्या १९ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०८ गावे व वाडी-तांड्यांना १०८ अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवले असताना तेथील अधिग्रहण मात्र कोणीही केलेले नाही. परिणामी, वृंदावन वॉटर पार्कमध्ये पर्यटक मनमुराद आनंद घेऊन पाण्याची उधळपट्टी करीत आहेत. वॉटर पार्कमध्ये असलेल्या बंधाऱ्यातील गढूळ पाणी फिल्टर करून वापरले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी असून, त्या पाण्याचा वापर वॉटर पार्कसाठी केला जातो. सध्या टंचाई असल्यामुळे वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दिवसाला १० ते १२ आणि रविवारच्या सुटीच्या दिवशी ४० च्या आसपास पर्यटक येतात. पाणीच नाही. त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होण्याचा प्रश्नच नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी फिल्टर करून पुन्हा वापरले जाते. हे पाणी संपल्यानंतर वॉटर पार्क बंदच ठेवावा लागेल. कर्मचारी व पशुधनासाठी टँकरने पाणी विकत घेतो. परंतु, वॉटर पार्कसाठी १२ लाख लिटर्स गढूळ पाणी साठवून ठेवले आहे. त्याचाच पुनर्वापर आम्ही करतो, असे वॉटर पार्कचे संचालक उत्तमराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.