शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात भीषण पाणीटंचाई; चाकूरच्या वॉटर पार्कमध्ये उधळपट्टी !

By admin | Updated: April 14, 2016 01:06 IST

संदीप अंकलकोटे , चाकूर लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की

संदीप अंकलकोटे , चाकूरलातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की लातूर शहरावर असताना चाकूर येथील वृंदावन वॉटर पार्कमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी राजरोस सुरू आहे. स्वत:च्या मालकीच्या बंधाऱ्यातून पार्कला पाणी वापरले जात असले, तरी तहानलेल्यांना ते मिळत नाही. व्यवसायासाठी या पाण्याचा वापर राजरोसपणे होत आहे.चाकूर येथे वृंदावन अ‍ॅम्युजमेंट वॉटर पार्क आहे. या वॉटर पार्कचा परिसर दोन एकरच्या आसपास असून, पाण्याचे मोठे तीन हौद आहेत. ९ ते १० हजार लिटर्स क्षमतेचा हा वॉटर पार्क असून, स्वत:च्या बंधाऱ्यातील पाणी वॉटर पार्कसाठी वापरले जाते. एकूण ५ बंधारे आहेत. त्यात पाणी साठवून ठेवलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी न देता वॉटर पार्कसाठी वापरले जाते. दररोज शेकडो पर्यटक या पार्कला भेटी देतात. बुधवारी २५ ते ३० पर्यटकांनी वॉटर पार्कचा आनंद लुटला. गेल्या आठ दिवसांत ५०० ते ७०० पर्यटकांनी भेटी देऊन वॉटर पार्कमधील पाणी खेळण्यासाठी वापरले. दिवसाला ३०० रुपये तिकीट वृंदावन अ‍ॅम्युजमेंट वॉटर पार्कसाठी आकारले जाते. या वॉटर पार्कसाठी किमान ८ ते १० हजार लिटर्स पाणी वापरले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. लातूर शहर व चाकूर तालुकाही टंचाईत होरपळला जात असताना वॉटर पार्कमध्ये मात्र बेसुमार पाण्याचा वापर केला जात आहे. चाकूर तालुक्यातील नदी, विहिरी, पाझर तलाव व सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीतही वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्याचा वापर बेसुमार होत आहे. चाकूर तालुक्यातील सध्या १९ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०८ गावे व वाडी-तांड्यांना १०८ अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवले असताना तेथील अधिग्रहण मात्र कोणीही केलेले नाही. परिणामी, वृंदावन वॉटर पार्कमध्ये पर्यटक मनमुराद आनंद घेऊन पाण्याची उधळपट्टी करीत आहेत. वॉटर पार्कमध्ये असलेल्या बंधाऱ्यातील गढूळ पाणी फिल्टर करून वापरले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी असून, त्या पाण्याचा वापर वॉटर पार्कसाठी केला जातो. सध्या टंचाई असल्यामुळे वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दिवसाला १० ते १२ आणि रविवारच्या सुटीच्या दिवशी ४० च्या आसपास पर्यटक येतात. पाणीच नाही. त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होण्याचा प्रश्नच नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी फिल्टर करून पुन्हा वापरले जाते. हे पाणी संपल्यानंतर वॉटर पार्क बंदच ठेवावा लागेल. कर्मचारी व पशुधनासाठी टँकरने पाणी विकत घेतो. परंतु, वॉटर पार्कसाठी १२ लाख लिटर्स गढूळ पाणी साठवून ठेवले आहे. त्याचाच पुनर्वापर आम्ही करतो, असे वॉटर पार्कचे संचालक उत्तमराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.