शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिडको-हडकोत भीषण पाणीटंचाई, रहिवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून दोन वेगवेगळ्या योजनांद्वारे शहरात पाणी आणण्याचे काम करण्यात येते. मात्र, पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. ...

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून दोन वेगवेगळ्या योजनांद्वारे शहरात पाणी आणण्याचे काम करण्यात येते. मात्र, पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. शहरातील विविध वसाहतींना पाचव्या दिवशी नियमितपणे पाणी देण्यात येते. सिडको-हडकोतील अनेक वसाहतींना नऊ दिवस झाले तरीही पाणी मिळालेले नाही. एन - २ भागातील नागरिकांना शुक्रवारी नवव्या दिवशी पाणी मिळाले नाही. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात सिडको-हडकोतील पाणीप्रश्न गंभीर बनतो. गतवर्षी कडक लॉकडाऊन असतानाही नागरिकांनी पाणी प्रश्नावर ओरड केली नाही. यंदाही एप्रिलपासून पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. सिडको-हडकोसह चिकलठाणापर्यंत नवव्या दिवशी तर कधी दहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. नक्षत्रवाडी येथून सिडको-हडकोसाठी स्वतंत्र एक्सप्रेस लाईन टाकण्यात आलेली आहे. सिडको एन - ५ आणि एन - ७ येथील पाण्याच्या टाक्यांवरून वितरण व्यवस्था करण्यात येते. सिडको एन - २ भागात शुक्रवारी नऊ दिवसांनंतरही नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. दरम्यान, या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले की, काही दिवसांपासून सिडको-हडकोतील वितरण व्यवस्था मागे-पुढे होत आहे. पाचव्या किंवा सहाव्या दिवशी प्रत्येक वसाहतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चिकलठाण्यापर्यंत काही वसाहतींना उशिराने पाणी देण्यात येत आहे.

कंत्राटदाराच्या टँकरकडे दुर्लक्ष

महापालिकेने २००पेक्षा अधिक वसाहतींना पाणी देण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ८५ ते ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकरचालक हे पाणी नेमके कुठे नेऊन देत आहेत, हे पाहण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही.