शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

सतरा हजार मतदार वाढले

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे.

प्रसाद आर्वीकर, परभणीजिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत आगामी निवडणुकांत मतदारांची संख्या वाढणार आहे.मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य दिले आहे. त्यातूनच मतदार जागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रथमच राबविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीमुळे यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. या लोकसभा मतदारसंघात १० टक्क्याने मतदार वाढले होते. विशेष म्हणजे वेळोवेळी मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमातून दीड लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतरही ९ ते ३० जून या काळात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमात १७ हजार ३६८ नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता १२ लाख ८६ हजार ५०५ एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)परभणीत प्रतिसादजिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परभणी विधानसभा मतदार- संघामध्ये ६ हजार ५८ मतदारांनी नव्याने नोंदणी केली. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३५४५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३४९९ आणि पाथरी विधानसभा मतदार- संघात ४३५६ मतदार नव्याने यादीत समाविष्ट झाले आहेत.दीड लाख मतदारांची झाली वाढ मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला होता. प्रत्येक घरोघर जाऊन मतदारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी झाली. त्यामुळे १८ ते २० या वयोगटातील नवमतदार मोठ्या संख्येने मतदार यादीत समाविष्ट झाले होते.बोगस मतदारांचीही उडविली नावेमतदारयादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळेस होती तर काही मतदार मयत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत शिल्लक होती. त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असे. जिल्हा प्रशासनाने अशी ८० हजार नावे मतदान यादीतून वगळली होती. विधानसभा मतदारसंख्यावाढीव एकूणजिंतूर३,१६,९३२३४५४३,२०,३८६परभणी२,७२,१४२६०५८२,७८,२००गंगाखेड३,५५,८४७३४९९३,५९,३४६पाथरी३,२४,२१६४३५६३,२८,५७२एकूण१२,६९,१३७१७,३६८१२,८६,५०५