शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सतरा हजार मतदार वाढले

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे.

प्रसाद आर्वीकर, परभणीजिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत आगामी निवडणुकांत मतदारांची संख्या वाढणार आहे.मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य दिले आहे. त्यातूनच मतदार जागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रथमच राबविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीमुळे यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. या लोकसभा मतदारसंघात १० टक्क्याने मतदार वाढले होते. विशेष म्हणजे वेळोवेळी मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमातून दीड लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतरही ९ ते ३० जून या काळात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमात १७ हजार ३६८ नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता १२ लाख ८६ हजार ५०५ एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)परभणीत प्रतिसादजिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परभणी विधानसभा मतदार- संघामध्ये ६ हजार ५८ मतदारांनी नव्याने नोंदणी केली. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३५४५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३४९९ आणि पाथरी विधानसभा मतदार- संघात ४३५६ मतदार नव्याने यादीत समाविष्ट झाले आहेत.दीड लाख मतदारांची झाली वाढ मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला होता. प्रत्येक घरोघर जाऊन मतदारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी झाली. त्यामुळे १८ ते २० या वयोगटातील नवमतदार मोठ्या संख्येने मतदार यादीत समाविष्ट झाले होते.बोगस मतदारांचीही उडविली नावेमतदारयादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळेस होती तर काही मतदार मयत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत शिल्लक होती. त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असे. जिल्हा प्रशासनाने अशी ८० हजार नावे मतदान यादीतून वगळली होती. विधानसभा मतदारसंख्यावाढीव एकूणजिंतूर३,१६,९३२३४५४३,२०,३८६परभणी२,७२,१४२६०५८२,७८,२००गंगाखेड३,५५,८४७३४९९३,५९,३४६पाथरी३,२४,२१६४३५६३,२८,५७२एकूण१२,६९,१३७१७,३६८१२,८६,५०५