शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील साडेपाच हजार विद्युत मीटर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ...

ठळक मुद्देधडक मोहीम : शहरात एक हजाराहून अधिक थकबाकी असलेले ६५ हजार ग्राहक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या वतीने सध्या शहरात वीज बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जवळपास ५ हजार ५७९ ग्राहकांचे विद्युत मीटर काढून घेऊन ते जप्त करण्यात आलेले आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत औरंगाबाद शहर मंडळामध्ये १ हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेले घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची संख्या ६५ हजार ६१० एवढी असून, त्यांच्याकडे ७८ कोटी २१ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. शहराच्या विविध उपविभागात महावितरण कंपनीने थकबाकी ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसाठी १ फेब्रुवारीपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसुलीसोबत थकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करणे, विद्युत मीटर जप्त करून सदरील ग्राहकाचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याची मोहीम राबविली जात आहे. ज्या उपविभागात वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे, अशा उपविभागाच्या अधिकाºयांना मार्चअखेरपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील उपविभागासाठी १३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत ३९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाºया अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांना सातत्याने सूचना दिल्यानंतरही वीज बिल न भरणाºया ग्राहकांचे विद्युत मीटर जप्त करण्यात आले आहे. यामध्ये छावणी-२०१९, पॉवरहाऊस- ४०९, शहागंज-१७५१, सिडको- १०६, चिकलठाणा-७४३, गारखेडा-२७३, क्रांतीचौक-२५२ असे एकूण ५ हजार ५७९ मीटर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेला मान्यताविद्युत मीटर, इन्सुलेटर आणि ट्रान्स्फार्मरची तपासणी करण्यासाठी महावितरणकडे औरंगाबादेत प्रयोगशाळा आहे. मात्र, राज्यात महावितरणच्या कोणत्याही परिमंडळ कार्यालयाकडे कंडक्टर (विद्युत वाहक तारेची) गुणवत्ता चाचणी करण्याची प्रयोगशाळा नाही. औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या कंडक्टर टेस्टिंग प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. कंडक्टर टेस्टिंगसाठी प्रयोगशाळा असलेले औरंगाबाद परिमंडळ हे राज्यात पहिले परिमंडळ कार्यालय असेल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.