शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

जायकवाडीत सात दलघमीची आवक

By admin | Updated: July 6, 2016 23:58 IST

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आल्याची माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडी धरणातील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद, जालनासह विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. मंगळवारपर्यंत त्यातील २६५ दलघमी इतका पाणी उपसा झालेला होता. परंतु मंगळवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी धरणात कालच पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आले. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीपातळी ५४० दलघमी वर आली आहे. धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २५८ दलघमी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. त्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.