शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

जायकवाडीत सात दलघमीची आवक

By admin | Updated: July 6, 2016 23:58 IST

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे.

औरंगाबाद : धरण क्षेत्रातील पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आल्याची माहिती औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)चे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी दिली. जायकवाडी धरणातील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला आहे. तेव्हापासून औरंगाबाद, जालनासह विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या वापरासाठी या धरणाच्या मृतसाठ्यातूनच पाणी उपसा सुरू आहे. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. मंगळवारपर्यंत त्यातील २६५ दलघमी इतका पाणी उपसा झालेला होता. परंतु मंगळवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी धरणात कालच पाण्याची आवक सुरू झाली. मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ७ दलघमी पाणी आले. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीपातळी ५४० दलघमी वर आली आहे. धरणातील पाणी पातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २५८ दलघमी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. त्यासाठी अजून मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले असल्याचेही कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.