शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

कृत्रिम पावसाची मराठवाड्यात कायमस्वरुपी यंत्रणा उभारणार

By admin | Updated: August 6, 2015 00:07 IST

लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री

लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पावसाने सुरुवात केली. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे. कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मि.मी. पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मि.मी. इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे राज्यात पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्याची कामे आणखी वेगवान होणार आहेत. त्याच्या यशासाठी आम्हाला चांगल्या पावसाची गरज आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. पाणीटंचाई बरोबर चाराटंचाईही आहे. त्यासाठी बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील चाराटंचाईचा आढावा शासनाकडून घेण्यात येत आहे. या तिन्ही जिल्ह्यांत २२ लाखांपर्यंत पशुधन आहे. त्यांना १५०० रुपये प्रति हेक्टर चारा बियाणासाठी दिले जाणार आहेत. लातुरात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. त्यासाठी वेगळी उपाययोजना करावी लागेल, असेही महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.पत्रपरिषदेला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण तीन ऐवजी दर पाच वर्षांनी करणार ४एपीलमधील शेतकऱ्यांना बीपीएलच्या कोट्याप्रमाणे धान्य देणार. ४शेतकऱ्याचे पुढच्या चार वर्षातील कर्जाचे १२ टक्के व्याजातील सहा टक्के व्याज सरकार भरणार ४अडीच लाखाच्या खालील उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना फीजमध्ये ५० टक्के सवलत ४मराठवाड्यातील पशुपालकांसाठी आठ दिवसात पश्चिम महाराष्ट्रातून चारा आणणार; डेपोतून की छावण्यातून वाटप करायचे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरेल४दुबार पेरणीसाठी हेक्टरी १५०० रुपये व बियाणे सरकारकडून मिळेल