हदगाव : शहरात पूर्वीच्या चोरीचा तपास अपूर्ण असतानाच भुरट्या चोरांनी शहरात धुमाकूळ घातला. नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. याउलट पोलिस तक्रार घेण्यासाठी तयार नसल्याची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यामध्ये ७ मेपासून द्रोणागिरीनगर, शिक्षक कॉलनी, आयोध्यनगर आदी भागात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. परंतु नागरिकांच्या सतर्ककतेमुळे त्यांना मोठा हात मारता आला नाही. परंतु आठवड्याच्या प्रत्येक रात्रीला चोरांचे आगमन या भितीमुळे बालक व महिलावर्ग बेजार आहे. एन. वाय. काळे या शिक्षकाच्या घरी त्यांच्या पत्नी व लहान मुलगी घरी असताना ८ मेच्या मध्यरात्री २.२० वाजता चोरांनी प्रवेश केला. बाहेरुन दारांना कड्या लावल्या व पाळीव कुत्र्यासमोर व कुलरमध्ये नशेचे पावडर टाकल्यामुळे कुत्रा व काळे यांच्या पत्नी बेहोश झाल्या. परंतू त्यांच्या मुलीने घरात चोर घुसत असल्याचे पाहून शेजारी दादाराव ढोले यांना फोन केला. त्यांनी बाहेर आल्यामुळे चोरांनी पळ काढला. पंडित कदम (मेसवाले) यांच्या घरीही ९ मे रोजी चोरांनी प्रवेश केला व ७ हजार रुपये रोकड पळविली. यानंतर पळसा येथील अशोक चक्रवर्ती शाळेवर शिक्षक असलेल्या काकडे यांच्या घरातही प्रवेश केला. यानंतर १० मे रोजी क्षीरसागर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला. या विषयी हदगाव पोलिस ठाण्याला नागरिकांनी वीस ते पंचवीस नागरिकांनी अर्ज दिला. परंतु अर्ज घेऊन दाख न करताच तपास हातावर ठवला आहे. पोलिसांच्या या बघ्यच्या भूमिकेमुळे चोरांची हिम्मत वाढत आहे. आयोध्यानगरात एक महिन्यापूर्वी चोरी झाली होती. जैन मंदिरात चोरी झाली. त्या घटनेचा तपास शून्य असताना चोरट्यांनी पोलिसांना आवाहन केले आहे. सुट्यामुळे व लग्नसरईमुळे नागरिक कुलूप ठोकून बाहेरगावी जात आहेत. त्याचाच फायदा चोरटे घेत आहेत. (वार्ताहर)
हदगाव येथे चोर्यांची मालिका
By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST