शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर महिना कोरडा; उभी पिके करपू लागली

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

हिंगोली : सप्टेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. मोजून २७ पैकी ५ दिवसच पाऊस झाल्याने पिके अंतिम टप्प्यात पोहोचली.

हिंगोली : सप्टेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. मोजून २७ पैकी ५ दिवसच पाऊस झाल्याने पिके अंतिम टप्प्यात पोहोचली. गतवर्षीपेक्षाही वाईट स्थिती असताना कृषी विभागाला काही सोयरसुतक राहिले नाही. आता पुढे पावसाची शक्यता असल्याने शेतकरी घायकुतीला आला. प्रशासन निवडणुकीच्या कामांत गुंतले असल्याने बळीराजास कोणी वाली राहिला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनापासून पावसात अनियमितता आणि अनिश्चितता आहे. आॅगस्ट महिनाही कोरडा जाण्याची मार्गावर असताना शेवटी पाऊस झाला. सप्टेंबरचे पहिले दोन दिवसनंतर ७ आणि ८ रोजी आठवडाभर पाऊस झाला. तेव्हापासून शनिवारपर्यंत पावसाने नाव घेतलेले नाही. घटस्थापनेपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षा होती. नवरात्रोत्सवाला आत तीन दिवस लोटले. तरीही पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी, जिल्ह्यात दयनिय स्थिती निर्माण झाली. बहुतांश ठिकाणी पिके वाळून गेली. अनेकांनी तर ही पिके रानाबाहेर काढली. यापूर्वीच्या सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी वाढली. खर्च दुपटीवर गेला. दरम्यान, मान्सून परतीचा कालावधी संपत आला. तरीही जिल्ह्यात ५० टक्केच पाऊस झाला. त्यातही खंड पडला. औंढा आणि सेनगाव वगळता तिन्हीही तालुक्याला ५०० मिमीचा आकडा गाठता आलेला नाही. सर्वच पिके अंतिम घटका मोजत असताना कृषी अधिकारी कार्यालयाबाहेर निघत नाहीत. यापुढे पाऊस पडेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही.कृषी विभागाने आता लक्ष दिले नाही तर शेतकरी मोडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढणाऱ्या पिकांवर काही उपाय नसला तरी किडीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेली पिकी तरी वाचविता येईल. मात्र कृषी विभागाला त्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. (प्रतिनिधी)