शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

सप्टेंबर महिना कोरडा; उभी पिके करपू लागली

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

हिंगोली : सप्टेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. मोजून २७ पैकी ५ दिवसच पाऊस झाल्याने पिके अंतिम टप्प्यात पोहोचली.

हिंगोली : सप्टेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. मोजून २७ पैकी ५ दिवसच पाऊस झाल्याने पिके अंतिम टप्प्यात पोहोचली. गतवर्षीपेक्षाही वाईट स्थिती असताना कृषी विभागाला काही सोयरसुतक राहिले नाही. आता पुढे पावसाची शक्यता असल्याने शेतकरी घायकुतीला आला. प्रशासन निवडणुकीच्या कामांत गुंतले असल्याने बळीराजास कोणी वाली राहिला नसल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या आगमनापासून पावसात अनियमितता आणि अनिश्चितता आहे. आॅगस्ट महिनाही कोरडा जाण्याची मार्गावर असताना शेवटी पाऊस झाला. सप्टेंबरचे पहिले दोन दिवसनंतर ७ आणि ८ रोजी आठवडाभर पाऊस झाला. तेव्हापासून शनिवारपर्यंत पावसाने नाव घेतलेले नाही. घटस्थापनेपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षा होती. नवरात्रोत्सवाला आत तीन दिवस लोटले. तरीही पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी, जिल्ह्यात दयनिय स्थिती निर्माण झाली. बहुतांश ठिकाणी पिके वाळून गेली. अनेकांनी तर ही पिके रानाबाहेर काढली. यापूर्वीच्या सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी वाढली. खर्च दुपटीवर गेला. दरम्यान, मान्सून परतीचा कालावधी संपत आला. तरीही जिल्ह्यात ५० टक्केच पाऊस झाला. त्यातही खंड पडला. औंढा आणि सेनगाव वगळता तिन्हीही तालुक्याला ५०० मिमीचा आकडा गाठता आलेला नाही. सर्वच पिके अंतिम घटका मोजत असताना कृषी अधिकारी कार्यालयाबाहेर निघत नाहीत. यापुढे पाऊस पडेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही.कृषी विभागाने आता लक्ष दिले नाही तर शेतकरी मोडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढणाऱ्या पिकांवर काही उपाय नसला तरी किडीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलेली पिकी तरी वाचविता येईल. मात्र कृषी विभागाला त्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. (प्रतिनिधी)