शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

विमान आणि उद्योग क्षेत्रात खळबळ

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील त्यांच्या अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात कारवाई झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला नाही. शिवाय विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.डी.जी. साळवे यांची बदली झाल्यानंतर जुलै २०१५ मध्ये चिकलठाणा विमानतळाच्या संचालकपदावर आलोक वार्ष्णेय यांची बदली करण्यात आली. वार्ष्णेय यापूर्वी दिल्ली येथील विमानतळाच्या संचालकपदी कार्यरत होते. विमानतळावरून कार्गो सेवा, औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा, वायफाय सुविधा, रेस्टॉरंट सेवा आणि नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न यामुळे ते कायम चर्चेत राहिले. मात्र त्याच वेळी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. विमानतळावर टॅक्सी सेवा सुरू करण्यावरून टॅक्सी संघटना आणि प्राधिकरणात धुसफूस सुरू होती. आधीच एका कंपनीतर्फे सेवा सुरू असताना पुन्हा दुसऱ्यास सेवेस मंजुरी देणे अडचणीचे असल्याचे वार्ष्णेय यांचे म्हणणे होते, तर ही सेवा सुरू करण्यास मंजुरी द्या, त्यासाठी आवश्यक वाटल्यास निविदा प्रक्रिया करावी, असे संघटनेचे म्हणणे होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून संघटना आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. गिफ्ट म्हणून गाडी?वार्ष्णेय ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्यानंतर काही जण त्यांच्या कार्यपद्धतीवर चांगलीच टीका करीत आहेत. अनेक कामांसाठी ते जाणीवपूर्वक अडवणूक करीत होते. ४देवाणघेवाण केल्यानंतरच त्यावर तोडगा निघत होता. त्यांना एका कंत्राटदाराने गिफ्ट म्हणून चारचाकी गाडीची आॅफर दिल्याची चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे.पदभार शरद येवले यांच्याकडेआलोक वार्ष्णेय यांच्यावरील कारवाईमुळे आता उपमहाप्रबंधक शरद येवले यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त पदभार येणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.