शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विमान आणि उद्योग क्षेत्रात खळबळ

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील त्यांच्या अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात कारवाई झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला नाही. शिवाय विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.डी.जी. साळवे यांची बदली झाल्यानंतर जुलै २०१५ मध्ये चिकलठाणा विमानतळाच्या संचालकपदावर आलोक वार्ष्णेय यांची बदली करण्यात आली. वार्ष्णेय यापूर्वी दिल्ली येथील विमानतळाच्या संचालकपदी कार्यरत होते. विमानतळावरून कार्गो सेवा, औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा, वायफाय सुविधा, रेस्टॉरंट सेवा आणि नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न यामुळे ते कायम चर्चेत राहिले. मात्र त्याच वेळी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. विमानतळावर टॅक्सी सेवा सुरू करण्यावरून टॅक्सी संघटना आणि प्राधिकरणात धुसफूस सुरू होती. आधीच एका कंपनीतर्फे सेवा सुरू असताना पुन्हा दुसऱ्यास सेवेस मंजुरी देणे अडचणीचे असल्याचे वार्ष्णेय यांचे म्हणणे होते, तर ही सेवा सुरू करण्यास मंजुरी द्या, त्यासाठी आवश्यक वाटल्यास निविदा प्रक्रिया करावी, असे संघटनेचे म्हणणे होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून संघटना आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. गिफ्ट म्हणून गाडी?वार्ष्णेय ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्यानंतर काही जण त्यांच्या कार्यपद्धतीवर चांगलीच टीका करीत आहेत. अनेक कामांसाठी ते जाणीवपूर्वक अडवणूक करीत होते. ४देवाणघेवाण केल्यानंतरच त्यावर तोडगा निघत होता. त्यांना एका कंत्राटदाराने गिफ्ट म्हणून चारचाकी गाडीची आॅफर दिल्याची चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे.पदभार शरद येवले यांच्याकडेआलोक वार्ष्णेय यांच्यावरील कारवाईमुळे आता उपमहाप्रबंधक शरद येवले यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त पदभार येणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.