शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

सेना-भाजपने केली कोरोना नियमांची एैशीतैसी

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना- भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहरात राजकीय मिळावे घेण्यात येत आहेत. ...

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना- भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहरात राजकीय मिळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यामध्ये राजकीय पक्षांकडून कोरोनाच्या नियमांची एैशीतैसी करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी आहे. महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एका हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी महाआघाडीतील कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. तापडिया नाट्यमंदिर पूर्णपणे भरले होते. व्यासपीठावरदेखील कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. विशेष बाब म्हणजे कार्यकर्त्यांनी मास्कचासुद्धा वापर केला नाही. यासंदर्भात लोकमत वृत्तपत्र समूहाने कोरोना नियमांची राजकीय पक्षांकडून कशा पद्धतीने एैशीतैसी करण्यात येत आहे, यावर छायाचित्रांसह प्रकाश टाकला होता. याची गंभीर दखल मंगळवारी महापालिका प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतली. त्यांनी उघडपणे नाराजीही दर्शविली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना अशी गर्दी योग्य नाही, असे ते म्हणाले. बिहारच्या निवडणुकीत प्रचार सभा, बैठकांमधून अशीच गर्दी होत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेथे सुमारे १५० गुन्हे दाखल केले. तापडिया नाट्यमंदिरातील भाजप मेळाव्यात झालेली गर्दी, मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन सभेचीदेखील निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष योग्य दखल, घेईल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.