शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भाजीपाल्याची बेभाव विक्री

By admin | Updated: May 7, 2014 23:59 IST

परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लागवड खर्चही निघत नाही. त्यातच मालवाहतुकीचा तोटा टाळण्यासाठी उत्पादक शेतकरी अक्षरश: जनावरांना चारा म्हणून भाजीपालाच टाकू लागले आहेत. भेंडी १५ ते २० रुपये, चवळी २० ते ३५रुपये, कांदा १० रुपये, गवार २० रुपये, वांगे, १५, टोमॅटे १५ रुपये किलो दर विक्री होत आहेत. पालक, मेथी तसेच कोथिंबीर जुडी दोन ते तीन रुपयांना विक्री होत आहे. हे दर अगदी किरकोळ असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजीपाला विकला तर भाजी नाही, तर पाला असे भाजीपाल्याबाबत म्हटले जाते. सध्या ते सत्यात उतरत आहे. यावर्षी सर्वत्र पाणीपातळी उत्तम असल्याने सर्वच पिकांना पाणी मुबलक मिळत आहे. तालुक्यात भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातच उत्पादन चांगले आल्याने टोमॅटो, भेंडी, वांगी, गवार, चवळी, कोबी, पालक आदी भाज्यांना किरकोळ भाव मिळत आहे. तो परवडत नसल्याने तो थेट जनावरांना वैरण म्हणून टाकला जात आहे. कांद्याचे भाव तर मोठ्या प्रमाणात गडगडल्याने कांदा विक्रेत्यांसह उत्पादकाच्यांही डोळ्यांत पाणी आणत आहे. यासंदर्भात भाजीपला विक्रेते दत्ता घनवट व भोकरे म्हणाले की, भाजीपाल्याला भाव नसल्याने मोठे नुकसान होत आहे. नफा होणे तर दूरच कधी-कधी घरातूनच पैसे जातात असेही ते म्हणाले. (वार्ताहर) दुसरा झटका गारपिटीत पिकांचे नुकसान झाल्याने अगोदरच अनेक शेतकरी गारद झाले. त्यातून अपवादानेच कोणी सुटले. मात्र तरीही उभारी घेण्यासाठी भाजीपाल्याकडे वळलेल्या शेतकर्‍यांना दर घसरणीचा दुसरा झटका बसला आहे.