शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

२५ गावांची जलयुक्त शिवारसाठी निवड

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़

भोकरदन : तालुक्यातील २५ गावांची सन २०१७- १८ साठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे़ तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी भोकरदन तालुक्यातील २५ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केली आहे. गावांची निवड करून ती नावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी तालुक्यातील वाकडी, कोठा कोळी, कोळेगाव, कठोरा जैनपुर, क्षिरसागर, आलापुर, भिवपुर, पंढरपुर, चांदई ठोंबरी, नळणी बु, कोपर्डा, सोयगाव देवी, थिगळखेडा, खामखेडा, पारध बु, शेलुद,सिरजगाव वाघृळ, खडकी, पळसखेडा दाभाडी, सुरंगळी, हसनाबाद, तपोवन, चांदई एक्को, उमरेखडा, जानेफळ दाभाडी, या २५ गावाची निवड करण्यात आली आहे. तर गेल्या दोन वर्षामध्ये तालुक्यातील २०१५ - १६ मध्ये ३४ गावे तर २०१७ -१७ मध्ये ३१ गावे अशा एकूण ६५ गावांची निवड जलयुक्त शिवार योजने मध्ये निवड करण्यात आली होती. त्या गावांपैकी ६० टक्के गावामध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. मात्र ४० टक्के गावांची केवळ निवड झाली आहे. या गावांमध्ये जलयुक्तची कामे समाधान कारक करण्यात आली नाही. त्याला कोण जबाबदार आहे याच्या आत्मपरिक्षणाची गरज आहे. मात्र ६५ गावांपैकी ठराविक गावांमध्येच जलयुक्तची कामे करण्यात आली आहे. ज्या गावांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली अशा गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे टँकर देऊ नये, असे निर्र्देश आहेत. तर गेल्या दोन वर्षांत ज्या गावात जलयुक्तची कामे झाली अशा गावांत सुध्दा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)