शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

गुणवत्ता वाढीसाठी करणार २०० शाळांची निवड

By admin | Updated: April 29, 2015 00:52 IST

जालना : सर्वशिक्षा अभियानच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे

जालना : सर्वशिक्षा अभियानच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी २०१५-१६ या वर्षासाठी जिल्ह्यातील २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची आर्थिक तरतूद भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मंजूर केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी दिली.या उपक्रमाअंतर्गत शाळांच्या निवडीसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येक समूह साधन केंद्रातून एक शाळा याप्रमाणे २०० शाळांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद, नगर परिषदांकडे असणार आहे. शाळा निवडीसाठी आवश्यक बाबींची माहिती विस्तृतपणे नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील व समूह साधन केंद्रावर केंद्रप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करावयाची आहे. समूह साधन केंद्राअंतर्गत सर्व शिक्षकांची बैठक व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण व निवड २ मे रोजी होणार आहे. गटसाधन केंद्रावर निवडलेल्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी ६ मे रोजी बैठक बोलावण्यात येणार आहे. जिल्हा कार्यालयास प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे एकूण २१२ शाळांची यादी व सादरीकरण प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)