शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST

सोमनाथ खताळ , बीड सुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला.

सोमनाथ खताळ , बीडसुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला. या गाड्यांचे दुरुस्ती काम (मेंटेनन्स) व्यवस्थित न झाल्याने अपघात झाल्याचा सूर चालकांमधून उमटत आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र रस्ता व वाहकाला दोषी धरले आहे. कोलमडलेले वेळापत्रक, स्थानकांची ुदुरवस्था व खटारा बसगाड्या... यामुळे सामान्यांची लालपरी ‘समस्या’पूरच्या दिशेने धावू लागली आहे.शनिवारी रात्री आठच्या सुमारास शिरूर नदीजवळ (अहमदनगर) व रविवारी सकाळी बीडजवळील तळेगाव फाट्याजवळ बीड आगाराच्या दोन बसगाड्यांचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातास नेमके कारण काय होते ? याची कारणमिमांसा काढली असता बसगाड्या नादुरूस्त असल्याचे समजले. अनेक बसगाड्यांचे ब्रेकचे प्रॉब्लेम स्टेअरिंगही जाम जात असल्याचे चालकांनी सांगितले. या खटाऱ्या बसगाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणी येतात. एवढेच नव्हे तर चालकांना सुद्धा याचा मोठा त्रास होतो. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. अपघातांबद्दल यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, आमच्या सर्व गाड्या दुरूस्त आहेत. चालक काही पण सांगतात. आम्ही रोज चेकिंग करतो, असेही त्यांनी सांगितले.ब्रेक-हॉर्न, एका बाजूला ओढणे, पॉवर स्टेअरिंग असून सुध्दा जाम होणे, वायपर बंद, गिअर बॉक्स व्यवस्थित नाही आदी समस्यांचा पाढा चालकांनी ‘लोकमत’समोर वाचून दाखविला.