शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

माध्यमिक शिक्षकाच्या १९ जागा होणार रद्द

By admin | Updated: November 3, 2016 23:53 IST

उस्मानाबाद : शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त गुरूजींचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आॅनलाईन समायोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त गुरूजींचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आॅनलाईन समायोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार शाळाही देण्यात आल्या. परंतु, आजवर ३२ पैकी केवळ १३ शाळांनीच गुरूजींना रूजू करून घेतले आहे. त्यामुळे संबंधित शाळांतील शिक्षकांची १९ पदे रद्द केली जाणार आहेत. यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरात सध्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा अशा अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनासाठी पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धत अवलंबिण्यात आली. रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षकांची सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाभरात तब्बल ८३ शिक्षक अतिरिक्त असल्याचे समोर आले होते. या शिक्षकांच्या समायोजनासाठी १४ सप्टेंबर रोजी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदरील प्रक्रियेदरम्यान ८३ पैकी केवळ ३२ गुरूजींचे समायोजन करण्यात आले. संबंधित शिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने नियुक्ती आदेशही देण्यात आले. सदरील कार्यवाहीनंतर त्या-त्या शिक्षकांना ताडीने रूजू करून घेणे बंधनकाकर होते. परंतु, जवळपास दीड ते दोन महिने संबंधित शिक्षकांनी शिक्षण संस्थांकडे रूजू करून घेण्यासाठी खेटे मारूनही २७ आॅक्टोबरपर्यंत केवळ दहाच गुरूजींना रूजू करून घेण्यात आले होते. त्यावर शिक्षण विभागाकडून जवळपास २२ शिक्षण संस्थांना नोटीस देवून शिक्षकांना रूजू करून घ्या, अन्यथा रिक्त जागा व्यपगत केल्या जातील, असा इशारा दिला होता. यासाठी ३० आॅक्टोंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. सदरील कालावधीत २२ पैकी केवळ ३ शिक्षकांना रूजू करून घेतले आहे. दरम्यान, वारंवार नोटिसा, सूचना देवूनही १९ गुरूजींना रूजू न करून घेतल्याने आता शिक्षण विभागाकडून थेट शिक्षकांची संबंधित रिक्त पदे रद्द (व्यपगत) करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. सदरील कारवाईमुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)