शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साडेपाच वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही ...

औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही झालेच नाही. त्यातच आता एकेरी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे लवकरच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. पण साडेपाच वर्षांपूर्वींचे काम अजूनही कागदावरच आहे, त्यामुळे हे नवे काम तरी प्रत्यक्षात कधी होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा माॅडेल रेल्वे स्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात सध्याची भव्य इमारत उभी राहिली. माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. परंतु साडेपाच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही.

रेल्वे स्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे केवळ ‘बोलाचा भात’ ठरते आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लवकर रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर सध्या विविध कामांचा धडाका सुरू आहे. जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी करून दुरवस्थेवर केवळ वरवर पांघरूण घालण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात सध्या काही माहिती देता येणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले.

केवळ आश्वासन; प्रत्यक्षात काही नाही

रेल्वेकडून केवळ आश्वासनं दिली जातात. हे सर्वेक्षण सुरू आहे, असे सांगितले जाते. भूमिपूजन केले जाते. प्रत्यक्षात काही होत नाही. छोट्या-छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला. परंतु आपल्या स्टेशनचा विकास का करत नाही, असा प्रश्न आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे केवळ काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.

- खासदार इम्तियाज जलील

फाेटो ओळ...

रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या तोंडावर रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.