शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

खरिपाच्या नुकसानीचा दुसरा हप्ता वर्ग

By admin | Updated: February 11, 2015 00:27 IST

बीड: जिल्ह्यातील खरीप पिकाच्या नुकसानीच्या भरपाईचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला आहे. तब्बल १४२ कोटी ६२ लाख ३३ हजार रूपये तहसीलदारांकडे वर्ग केले असल्याचे

बीड: जिल्ह्यातील खरीप पिकाच्या नुकसानीच्या भरपाईचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला आहे. तब्बल १४२ कोटी ६२ लाख ३३ हजार रूपये तहसीलदारांकडे वर्ग केले असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत असल्याने यंदाच्या खरीप पिकाने बळीराजाला धोका दिला. या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून पहिला हप्ता ९ जानेवारी दरम्यानच तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला होता. मंगळवारी खरीप पिकांचे अनुदानही ज्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नुकसानभरपाई बँकेत जमा झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकामध्ये उघडलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. काही बँकाकडून कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी केला. तातडीने भरपाई द्यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)शासनाकडून खरीप पिकाच्या नुकसानीचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडून संबंधीत तहसीलदारांकडे वर्ग झाल्यानंतर विविध बँकांमार्फत वितरण करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या बँकाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. यातही काही राष्ट्रीयकृत बँकाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण सांगितले जात आहे. तर काही बँकाचा दृष्टीकोण नकारात्मक असल्याचेही पहावयास मिळत आहे. याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत असल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडे अनुदान वाटपाचे काम दिलेले आहे तर काही तालुक्यांमध्ये जिल्हा बँकेकडे खरीपाच्या नुकसानीचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे. काही बँकांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी तासन-तास बँकेच्या दारात रांगेमध्ये उभे रहावे लागत आहे.