शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !

By admin | Updated: March 27, 2015 00:25 IST

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या २४ हजारांहून अधिक पाल्यांना याचा फटका बसणार आहे. उल्लेखनीय हे की, वसतिगृहे आधीच एक महिना उशिराने सुरू झालेली आहेत.जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची २४ हजार ७४० इतकी मुले ४८१ हंगामी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांत शिक्षणासोबतच निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांना विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिना उलटल्यानंतर एकही वसतिगृह सुरू होऊ शकले नव्हते. महिनाभर उशिराने सुरू झालेली वसतिगृहे आता ३१ मार्च रोजी बंद करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.वसतिगृहांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षांपूर्वीच वसतिगृहांना टाळे लागणार असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा आधार हरवणार आहे. वसतिगृहे महिनाभर उशिराने सुरू झाली. त्यामुळे आणखी महिनाभर मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शिक्षण विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याउलट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र धाडून वसतिगृहे ३१ मार्च रोजी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यामागे आठ हजारावर खर्चवसतिगृहाची जबाबदारी मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीवर आहे. प्रति विद्यार्थी ८२०० रूपये इतका खर्च सहा महिन्यात होतो. हंगामी वसतिगृहात कमीत कमी २० विद्यार्थी असणे आवश्यक आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १९ कोटी ८२ लाख ९२ हजार रूपये इतका निधी मंजूर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ कोटी ४८ लाख ७८ हजार ६५६ रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसतिगृह चालकांची उसनवारी सुरू आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड म्हणाले. (प्रतिनिधी)फेब्रुवारीमध्ये १४८ केंद्रप्रमुख, ९ विस्तार अधिकारी व ५ अधिकाऱ्यांमार्फत वसतिगृहांची तपासणी झाली. त्यात २४ हजार ७४० विद्यार्थी आढळून आले. आढळलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वाटप करण्याच्या सूचना सीईओ नामदवे ननावरे यांनी दिल्या.परीक्षा बाकी असल्या तरी शासनाने ३१ मार्च रोजी वसतिगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.- सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (प्रा.)परीक्षा होणे बाकी असल्यामुळे हंगामी वसतिगृहांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस एकाही गटशिक्षणाधिकाऱ्याने केली नाही. शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनीही तसदी घेतलेली नाही.