शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !

By admin | Updated: March 27, 2015 00:25 IST

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या २४ हजारांहून अधिक पाल्यांना याचा फटका बसणार आहे. उल्लेखनीय हे की, वसतिगृहे आधीच एक महिना उशिराने सुरू झालेली आहेत.जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची २४ हजार ७४० इतकी मुले ४८१ हंगामी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांत शिक्षणासोबतच निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांना विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिना उलटल्यानंतर एकही वसतिगृह सुरू होऊ शकले नव्हते. महिनाभर उशिराने सुरू झालेली वसतिगृहे आता ३१ मार्च रोजी बंद करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.वसतिगृहांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षांपूर्वीच वसतिगृहांना टाळे लागणार असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा आधार हरवणार आहे. वसतिगृहे महिनाभर उशिराने सुरू झाली. त्यामुळे आणखी महिनाभर मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शिक्षण विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याउलट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र धाडून वसतिगृहे ३१ मार्च रोजी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यामागे आठ हजारावर खर्चवसतिगृहाची जबाबदारी मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीवर आहे. प्रति विद्यार्थी ८२०० रूपये इतका खर्च सहा महिन्यात होतो. हंगामी वसतिगृहात कमीत कमी २० विद्यार्थी असणे आवश्यक आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १९ कोटी ८२ लाख ९२ हजार रूपये इतका निधी मंजूर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ कोटी ४८ लाख ७८ हजार ६५६ रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसतिगृह चालकांची उसनवारी सुरू आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड म्हणाले. (प्रतिनिधी)फेब्रुवारीमध्ये १४८ केंद्रप्रमुख, ९ विस्तार अधिकारी व ५ अधिकाऱ्यांमार्फत वसतिगृहांची तपासणी झाली. त्यात २४ हजार ७४० विद्यार्थी आढळून आले. आढळलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वाटप करण्याच्या सूचना सीईओ नामदवे ननावरे यांनी दिल्या.परीक्षा बाकी असल्या तरी शासनाने ३१ मार्च रोजी वसतिगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.- सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (प्रा.)परीक्षा होणे बाकी असल्यामुळे हंगामी वसतिगृहांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस एकाही गटशिक्षणाधिकाऱ्याने केली नाही. शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनीही तसदी घेतलेली नाही.