शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !

By admin | Updated: March 27, 2015 00:25 IST

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे

बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या २४ हजारांहून अधिक पाल्यांना याचा फटका बसणार आहे. उल्लेखनीय हे की, वसतिगृहे आधीच एक महिना उशिराने सुरू झालेली आहेत.जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची २४ हजार ७४० इतकी मुले ४८१ हंगामी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांत शिक्षणासोबतच निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांना विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिना उलटल्यानंतर एकही वसतिगृह सुरू होऊ शकले नव्हते. महिनाभर उशिराने सुरू झालेली वसतिगृहे आता ३१ मार्च रोजी बंद करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.वसतिगृहांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षांपूर्वीच वसतिगृहांना टाळे लागणार असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा आधार हरवणार आहे. वसतिगृहे महिनाभर उशिराने सुरू झाली. त्यामुळे आणखी महिनाभर मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शिक्षण विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याउलट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र धाडून वसतिगृहे ३१ मार्च रोजी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यामागे आठ हजारावर खर्चवसतिगृहाची जबाबदारी मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीवर आहे. प्रति विद्यार्थी ८२०० रूपये इतका खर्च सहा महिन्यात होतो. हंगामी वसतिगृहात कमीत कमी २० विद्यार्थी असणे आवश्यक आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी १९ कोटी ८२ लाख ९२ हजार रूपये इतका निधी मंजूर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ कोटी ४८ लाख ७८ हजार ६५६ रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसतिगृह चालकांची उसनवारी सुरू आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड म्हणाले. (प्रतिनिधी)फेब्रुवारीमध्ये १४८ केंद्रप्रमुख, ९ विस्तार अधिकारी व ५ अधिकाऱ्यांमार्फत वसतिगृहांची तपासणी झाली. त्यात २४ हजार ७४० विद्यार्थी आढळून आले. आढळलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वाटप करण्याच्या सूचना सीईओ नामदवे ननावरे यांनी दिल्या.परीक्षा बाकी असल्या तरी शासनाने ३१ मार्च रोजी वसतिगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.- सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (प्रा.)परीक्षा होणे बाकी असल्यामुळे हंगामी वसतिगृहांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस एकाही गटशिक्षणाधिकाऱ्याने केली नाही. शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनीही तसदी घेतलेली नाही.