शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

मनपाकडून ७५ दुकानांना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:47 IST

औरंगाबाद खंडपीठाने एका जनहित याचिकेत महापालिकेच्या ३०० गाळेधारकांना सील ठोकण्याचे आदेश दिले. यानंतर खंडपीठाने परत गाळेधारकांकडून ५० टक्के रक्कम भरून घेण्याची मुभा दिली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका जनहित याचिकेत महापालिकेच्या ३०० गाळेधारकांना सील ठोकण्याचे आदेश दिले. यानंतर खंडपीठाने परत गाळेधारकांकडून ५० टक्के रक्कम भरून घेण्याची मुभा दिली. महापालिकेने खंडपीठाच्या आदेशानुसार गुरुवारपासून कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी तीन वेगवेगळ्या पथकांनी दिवसभरात फक्त १० दुकानांनाच सील ठोकले. दुसºया दिवशी म्हणजेच शुक्रवारी ६५ दुकानांना सील केले. मात्र, या कारवाईत कुठेच ताळमेळ नव्हता. खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाईची औपचारिकता पार पाडण्यात येत होती.मनपाच्या मालमत्ता विभागाने ३०० दुकानांना सील ठोकण्यासाठी तीन पथक तयार केले. पहिल्या दिवशी तर मनपातील काही अधिकाºयांनी पथकात काम करण्यास नकार दिला. प्रशासनाने दिलेल्या नियुक्तीचे पालनच करण्यात आले नाही. ज्या अधिकाºयांनी पथकात काम करण्याची तयारी दर्शविली त्यांनी कारवाईची औपचारिकता पूर्ण केली. शुक्रवारी सकाळी औरंगपुºयातील पिया मार्केटमध्ये ३२ पेक्षा अधिक दुकानांना सील ठोकण्यात आले. गुलमंडी येथील भोलेश्वर मार्केटमध्ये १३ पेक्षा अधिक दुकानांना सील लावले. रेल्वेस्टेशन भागात मनपाच्या व्यापारी संकुलात कोणत्या पथकाने कारवाई केली. किती दुकाने सील केली याचा कोणताची तपशील वरिष्ठ अधिकाºयांकडे रात्री उशिरापर्यंत नव्हता. दोन दिवसांमध्ये ७५ दुकानांना सील केल्याचा दावा मालमत्ता विभागाकडून करण्यात येत होता.