शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:47 IST

अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव : यावर्षी जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पैठण तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात पाण्याचे टँकर सुरू असून, हेच टँकर नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव, बिडकिन, फारोळा, कांचवाडी, नक्षत्रवाडी, गेवराई व बोकूड जळगाव या भागात पाण्याचे टँकर मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जातो. हे पाण्याचे टँकर प्रादेशिक परिवहन विभागाच्या दृष्टीने अनेक टँकर हे भंगारात जमा करण्यायोग्य आहे. अनेक ट्रॅक्टरवरील पाण्याच्या टँकर अजूनही प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेली नसून या टँकर नंबर आलेले नाहीत. तीन वर्षांपासून पाणी माफियांचा पाणी विक्री हा व्यवसाय बनला आहे. नुकतेच मंगळवारी पाण्याच्या चितेगाव टोल नाक्यावर दुचाकीला धडक देऊन एक निष्पाप महिलेचा बळी घेतला.

गेल्या वर्षीही ११ मे २०१८ रोजी पाण्याचे टँकरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक देऊन एकाच वेळी नऊ जणांचा बळी घेतला होता. अनेक पाण्याचे टँकरला पाण्याची गळती लागत असल्याने रस्त्यानेच पाणी वाहून जाते. परिणामी रस्त्याने टँकर हेलकावे मारत असल्याने चालकाचा टँकर वरील ताबा सुटला जात आहे.

या भागात सुरू असलेले पासिंग न केलेले व भंगारात जमा करण्यायोग्य टँकरावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater transportजलवाहतूक