शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:47 IST

अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव : यावर्षी जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पैठण तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात पाण्याचे टँकर सुरू असून, हेच टँकर नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव, बिडकिन, फारोळा, कांचवाडी, नक्षत्रवाडी, गेवराई व बोकूड जळगाव या भागात पाण्याचे टँकर मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जातो. हे पाण्याचे टँकर प्रादेशिक परिवहन विभागाच्या दृष्टीने अनेक टँकर हे भंगारात जमा करण्यायोग्य आहे. अनेक ट्रॅक्टरवरील पाण्याच्या टँकर अजूनही प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेली नसून या टँकर नंबर आलेले नाहीत. तीन वर्षांपासून पाणी माफियांचा पाणी विक्री हा व्यवसाय बनला आहे. नुकतेच मंगळवारी पाण्याच्या चितेगाव टोल नाक्यावर दुचाकीला धडक देऊन एक निष्पाप महिलेचा बळी घेतला.

गेल्या वर्षीही ११ मे २०१८ रोजी पाण्याचे टँकरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक देऊन एकाच वेळी नऊ जणांचा बळी घेतला होता. अनेक पाण्याचे टँकरला पाण्याची गळती लागत असल्याने रस्त्यानेच पाणी वाहून जाते. परिणामी रस्त्याने टँकर हेलकावे मारत असल्याने चालकाचा टँकर वरील ताबा सुटला जात आहे.

या भागात सुरू असलेले पासिंग न केलेले व भंगारात जमा करण्यायोग्य टँकरावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater transportजलवाहतूक