शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:47 IST

अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव : यावर्षी जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पैठण तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात पाण्याचे टँकर सुरू असून, हेच टँकर नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

चितेगाव, बिडकिन, फारोळा, कांचवाडी, नक्षत्रवाडी, गेवराई व बोकूड जळगाव या भागात पाण्याचे टँकर मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जातो. हे पाण्याचे टँकर प्रादेशिक परिवहन विभागाच्या दृष्टीने अनेक टँकर हे भंगारात जमा करण्यायोग्य आहे. अनेक ट्रॅक्टरवरील पाण्याच्या टँकर अजूनही प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेली नसून या टँकर नंबर आलेले नाहीत. तीन वर्षांपासून पाणी माफियांचा पाणी विक्री हा व्यवसाय बनला आहे. नुकतेच मंगळवारी पाण्याच्या चितेगाव टोल नाक्यावर दुचाकीला धडक देऊन एक निष्पाप महिलेचा बळी घेतला.

गेल्या वर्षीही ११ मे २०१८ रोजी पाण्याचे टँकरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक देऊन एकाच वेळी नऊ जणांचा बळी घेतला होता. अनेक पाण्याचे टँकरला पाण्याची गळती लागत असल्याने रस्त्यानेच पाणी वाहून जाते. परिणामी रस्त्याने टँकर हेलकावे मारत असल्याने चालकाचा टँकर वरील ताबा सुटला जात आहे.

या भागात सुरू असलेले पासिंग न केलेले व भंगारात जमा करण्यायोग्य टँकरावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater transportजलवाहतूक