शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

उपक्रमांचा सुकाळ; डॉक्टरांचा दुष्काळ !

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र वर्ष-वर्ष डॉक्टरांची पदे भरली जात नाहीत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. एकूणच हे चित्र पाहिल्यानंतर उपक्रमांचा सुकाळ तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा दुष्काळ असल्याचे समोर येते. याचा फटका रुग्णसेवेसोबतच उपक्रमांनाही बसत आहे.जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ४२ च्या आसपास आहे. तर उपकेंद्राचा आकडा याच्या दुप्पट आहे. या आरोग्य केंद्रासाठी किमान ८४ डॉक्टरांचा आवश्यकता आहे. मात्र एखादे पद रिक्त झाल्यानंतर ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळेच रिक्त पदांचा आकडा महिन्यागणिक वाढत चालला आहे. आजघडीला ५० टक्केही डॉक्टर कार्यरत नाहीत. हीच अवस्था अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोमात गेली की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचा फटका निश्चितच खेडोपाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. तसेच विविध उपक्रम आणि योजनाही पूर्ण क्षमतेने राबल्या जात नाहीत.आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, माता मृत्यू आढावा, बाल आरोग्य, बालस्वास्थ्य कार्यक्रम, नवसंजीवन योजना, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, अर्श, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, कायदा १९९४, वैद्यकीय गर्भपात कायदा, प्रजनन व बाल आरोग्य प्रशिक्षण, नागरी आरसीएच कार्यक्रम, सहाय्यक अनुदान, मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, किमान गरजा कार्यक्रम, रुग्णालयीन सेवा, मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४, राष्ट्रीय मासिक आरोग्य कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मुलन आणि क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. परंतु हे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबविण्याइतकी प्रशासनाकडे क्षमता नाही. डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे नियमित आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. अनेकवेळा संतप्त ग्रामस्थ रुग्णालयाला ताळे ठोकत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाच्या हाती काहीच उरले नसल्याने आश्वासने देण्यापलीकडे काहीच करता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा प्रश्न फारच गंभीर बनला आहे. त्यामुळेच मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीमसारखा उपक्रम फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. (प्रतिनिधी)