शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा अजूनही मागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:19 IST

‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले.

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर संपूर्ण देशातील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र व राज्य प्रशासनाला शाळेमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सूचना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले. विद्यार्थी सुरक्षेबाबत गांभीर्याचा अभाव केवळ शालेय प्रशासनच नाही तर पालकांमध्येही दिसून आला.शहरातील अनेक शाळांमध्ये उत्तम सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा, शिक्षकांच्या वर्तणुकीबाबत आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत शाळा पुरेशा गंभीर नसल्याचे समोर आले. ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असून, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.