शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा अजूनही मागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:19 IST

‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले.

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर संपूर्ण देशातील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र व राज्य प्रशासनाला शाळेमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सूचना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले. विद्यार्थी सुरक्षेबाबत गांभीर्याचा अभाव केवळ शालेय प्रशासनच नाही तर पालकांमध्येही दिसून आला.शहरातील अनेक शाळांमध्ये उत्तम सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा, शिक्षकांच्या वर्तणुकीबाबत आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत शाळा पुरेशा गंभीर नसल्याचे समोर आले. ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असून, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.