शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा जम्बो आराखडा

By admin | Updated: February 23, 2016 00:41 IST

जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे.

जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे. प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या आराखड्यास विभागीय आयुक्त मान्यता देण्याची शक्यता नसल्याने जालनेकरांना टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. जालना शहरातील नवीन जालना भागातील २२ व जुना जालना भागातील २३ झोनसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. यात नवीन जालना भागात घाणेवाडी जलशयातून तर जुना जालना भागास जायकवाडी जलवाहिनीतून पुरवठा होतो. मात्र पालिकेच्या नियोजनाअभावी परिस्थिती भयावह आहे. नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच भटकंती करावी लागत आहे. पुढील चार महिने पाणी कसे पुरेल, याची चिंता आत्तापासूनच नागरिकांना सतावत आहे. नगर पालिकेने विभागीय आयुक्तांना हा अहवाल सादर केला आहे. टंचाई नियोजनापेक्षा आर्थिक नियोजनच मोठे असल्याचे चित्र आहे. पालिकेने पाठविलेल्या टंचाई आराखड्यात परिपूर्ण व विस्तृत विवेचन पाठविले असले तरी शहरात असे अलबेल याची शाश्वती नाही. चालू विंधन विहिरींची संख्या ९५० एवढी असल्याचे म्हटले आहे. ५५२ विंधन विहिरींची पाणी पातळी बऱ्यापैकी आहे. ३४८ विंधन विहिरीवरून अत्यल्प पाणीपुरवठा होतो. ५० ठिकाणी वीजपंप बसवून पाणी घेतले जाते. पालिका या ठिकाणावरून सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे म्हणत असले तरी अनेक विंधन विहिरी गायब आहेत. काही तर माहितच नाही. असे असूनही या कृती आराखड्यात नवीन विधिंन विहिरी घेऊन तसेच हँडपंप बसविण्यासाठी पालिकेने तब्बल २९ लाख ५० हजार रूपयांची मागणी केलेली आहे.दुरूस्तीसाठी पुन्हा १७ लक्ष रूपयांची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे याच आराखड्यात पालिकेने ९५० विंधन विहिरीतून बऱ्यापैकी पाणीपुरवठा नागरिकांना होत असल्योच म्हटले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लक्ष रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. वडरवाडी येथे जलवाहिनीसाठी १८ लाख, सिद्धार्थ नगर, एसटी वर्कशॉप परिसरासाठी २० लक्ष तर सटवाई तांडा परिसरातील जलवाहिनीसाठी १० लक्ष रूपयांचा आराखडा तयार केलाआहे. (प्रतिनिधी)