शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:32 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यामुळे शहरासह परिसरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. विद्यापीठामध्ये बुधवारी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाºयांनी स्वत:हूनच बंद पाळला. यामुळे दिवसभर विद्यापीठात शुकशुकाट होता. विद्यापीठाची मध्यवर्ती अभ्यासिकाही बंद असल्यामुळे विद्यार्थी वसतिगृहांमधून बाहेरच पडले नाहीत. अनेकांनी वसतिगृहातच बसून राहणे पसंत केले. विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या होणाºया परीक्षाही रद्द केल्यामुळे परीक्षा भवनातील वातावरणही शांतच होते. नागसेनवनातील महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. महाविद्यालये उघडलीच नाहीत. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, विवेकानंद महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माण, देवगिरी महाविद्यालयही बंदच होते. एक दिवसापूर्वीच बंदची हाक दिलेली असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालय प्रशासनाने धोका पत्करला नाही. त्याचवेळी विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयाकडे फिरकले नसल्याचे चित्र विविध शैक्षणिक संकुलांमध्ये दिसून आले. विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर केवळ सुरक्षा रक्षकच आढळून आले.शहरातील शाळांमध्येही बंदशहरातील इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांनी बंद पाळला; मात्र शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्यामुळे काही जि. प. शाळा भरल्या होत्या, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याचा निरोप पोहोचला नाही. याचा परिणाम अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पुन्हा परत यावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना काही काळ धावपळ करावी लागल्याचा प्रकार काही शाळांमध्ये घडला.कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे काही खासगी संस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वत: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात महानगरपालिकेच्या शाळांनाही सुटी देण्यात आली होती; मात्र शिक्षण विभाग आणि शासनाच्या वतीने शाळा बंदचा कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सकाळी शाळेत गेले होतो; परंतु शाळा बंद होत्या. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा बंद ठेवली आहे, तुम्ही घरी जा असे सांगितले. आधी निरोप न मिळाल्याने काहींना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितले.गुरुवारी विद्यापीठाचे कामकाज नियोजित वेळेनुसार सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली, तसेच सर्व उपस्थित कार्यक्रम, तासिका, अभ्यासिका, परीक्षा भवन सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.