शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी जारी केले आहेत.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. दहावी आणि बारावी इयत्तेचे वर्ग सोडून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला. शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेच आहे, शिवाय शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यास या संस्था चार दिवस बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.

५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वाय

कोरोनामुळे जरी ५ वी ते ९ आणि अकरावी पर्यंतचे वर्ग भरणार नसले तरी शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसे सगळेच शिक्षक उपस्थितीत असतात. जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी व इतर अभियान सुरू आहेत. त्या कामासाठी शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना कामावर यावे लागणार आहे, असे प्र.जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी असे

२२१८ पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी आहेत. तर नववी ते बारावी २ लाख ६७ हजार ७१९ विद्यार्थी आहेत. यातील नववी आणि अकरावीचे वर्ग भरणार नाहीत. त्यांना आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय असणार आहे. ७ हजार ६२३ शिक्षक कार्यरत आहेत. दहावी इयत्तेमध्ये ६५ हजार ११ तर बारावीमध्ये ५५ हजार १७७ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू राहणार आहेत.