शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गावात रुग्ण सापडल्यास शाळा पुन्हा बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत शाळा आहे, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण आढावा घेऊन शाळा, कोरोना रुग्ण असलेले गावे याची माहिती घेऊन तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भाग पूर्वपदावर येण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने करण्यावर भर असणार आहे. शहरात लसीकरण होतच आहे; परंतु ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत गती येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आजवर ३ लाख ६५ हजार ३६ नागरिकांना पहिला, तर ९७ हजार ८९७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मनपा हद्दीतील ११ लाख ७६ हजार ९९९, तर ग्रामीण भागात २१ लाख १० हजार ८१५ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील ९ लाख ६६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला ७ लाख ४३ हजार ६९६ नागरिकांनी पहिला, तर २ लाख २२ हजार ८९७ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात लसीकरण वेगाने करणार

शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी शहरात एक, तर ग्रामीण भागात दोन डोस होतील, अशा पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.