शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गावात रुग्ण सापडल्यास शाळा पुन्हा बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत शाळा आहे, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण आढावा घेऊन शाळा, कोरोना रुग्ण असलेले गावे याची माहिती घेऊन तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भाग पूर्वपदावर येण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने करण्यावर भर असणार आहे. शहरात लसीकरण होतच आहे; परंतु ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत गती येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आजवर ३ लाख ६५ हजार ३६ नागरिकांना पहिला, तर ९७ हजार ८९७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मनपा हद्दीतील ११ लाख ७६ हजार ९९९, तर ग्रामीण भागात २१ लाख १० हजार ८१५ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील ९ लाख ६६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला ७ लाख ४३ हजार ६९६ नागरिकांनी पहिला, तर २ लाख २२ हजार ८९७ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात लसीकरण वेगाने करणार

शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी शहरात एक, तर ग्रामीण भागात दोन डोस होतील, अशा पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.