शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

गावात रुग्ण सापडल्यास शाळा पुन्हा बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत शाळा आहे, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण आढावा घेऊन शाळा, कोरोना रुग्ण असलेले गावे याची माहिती घेऊन तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भाग पूर्वपदावर येण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने करण्यावर भर असणार आहे. शहरात लसीकरण होतच आहे; परंतु ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत गती येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आजवर ३ लाख ६५ हजार ३६ नागरिकांना पहिला, तर ९७ हजार ८९७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मनपा हद्दीतील ११ लाख ७६ हजार ९९९, तर ग्रामीण भागात २१ लाख १० हजार ८१५ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील ९ लाख ६६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला ७ लाख ४३ हजार ६९६ नागरिकांनी पहिला, तर २ लाख २२ हजार ८९७ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात लसीकरण वेगाने करणार

शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी शहरात एक, तर ग्रामीण भागात दोन डोस होतील, अशा पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.