शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

गावात रुग्ण सापडल्यास शाळा पुन्हा बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत शाळा आहे, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण आढावा घेऊन शाळा, कोरोना रुग्ण असलेले गावे याची माहिती घेऊन तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भाग पूर्वपदावर येण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने करण्यावर भर असणार आहे. शहरात लसीकरण होतच आहे; परंतु ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत गती येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आजवर ३ लाख ६५ हजार ३६ नागरिकांना पहिला, तर ९७ हजार ८९७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मनपा हद्दीतील ११ लाख ७६ हजार ९९९, तर ग्रामीण भागात २१ लाख १० हजार ८१५ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील ९ लाख ६६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला ७ लाख ४३ हजार ६९६ नागरिकांनी पहिला, तर २ लाख २२ हजार ८९७ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात लसीकरण वेगाने करणार

शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी शहरात एक, तर ग्रामीण भागात दोन डोस होतील, अशा पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.