शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळामाफियांकडून हप्ते वसुली

By admin | Updated: July 14, 2015 00:34 IST

औरंगाबाद : शिक्षण विभागाचे अधिकारी हेच जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना अभय देतात, अशा शाळांकडून ते दरमहा हप्ते वसूल करतात.

औरंगाबाद : शिक्षण विभागाचे अधिकारी हेच जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना अभय देतात, अशा शाळांकडून ते दरमहा हप्ते वसूल करतात. हेच खरे शाळामाफिया आहेत, असा आरोप जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. सोमवारी दुपारी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत अनधिकृत शाळांच्या विषयावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांनी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना थेट प्रश्न केला की, एक महिन्याचा कालावधी लोटला. आतापर्यंत अनधिकृत शाळांविरुद्ध कोणती कारवाई केली. केवळ नोटिसा बजावल्या म्हणजे कारवाई केली असे होत नाही. त्यावर शिक्षणाधिकारी उपासनी यांनी उत्तर दिले की, अशा सर्व शाळांना दंड भरण्याच्या व शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तेव्हा राजपूत यांनी प्रश्न केला की, किती शाळांनी दंड भरला आणि किती शाळा बंद झाल्या. तेव्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्याप अहवाल आलेला नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहासमोर सांगितले. जेव्हा केव्हा शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्न असतात, त्या त्या वेळी शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी हे जाणीवपूर्वक गैरहजर राहतात. हेच खरे शाळामाफिया आहेत. हे अनधिकृत शाळांकडून दरमहा हजारो रुपयांची वसुली करतात व त्यांना अभय देतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास ते धजावत नाहीत. एक महिन्यापासून जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा प्रश्न चर्चेला येत आहे. त्यावर थातुरमातुर कारवाई केली जाते. आतापर्यंत शाळांना नोटिसा बजावल्या तर त्यांच्याकडून दंड का वसूल केला नाही. या प्रश्नाच्या उत्तरादाखल शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ शाळांनी खुलासे केले आहेत. त्या शाळा पहिलीचे नव्हे तर बालवाडीचे वर्ग चालवतात. त्यावर सदस्यांनी सांगितले की, शिक्षणाधिकाऱ्यांचे हे म्हणणे इतिवृतात घ्या. पुढच्या बैठकीत त्या शाळांच्या वरच्या वर्गाच्या ‘टीसी’ आम्ही सभागृहासमोर सादर करतो. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहाला विश्वास दिला की, येत्या आठ दिवसांत सर्व अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल. या बैठकीत शिक्षण विभागावरच चर्चा झाली आणि आचारसंहितेच्या नावाखाली अन्य विषयांवर चर्चा न करताच ही बैठक गुंडाळण्यात आली. आजच्या बैठकीत किती गटशिक्षणाधिकारी उपस्थित आहेत, अशी विचारणा केली असता चार तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी बैठकीस अनुपस्थित होते. आज बैठक होती हे माहिती असतानादेखील गटशिक्षणाधिकारी मुद्दाम अनुपस्थित राहिले. अनधिकृत शाळांना वाचविण्यासाठी ते बैठकांना न येता प्रतिनिधींना पाठवितात, हे योग्य आहे का, असा प्रश्न दीपक राजपूत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना केला. तेव्हा डॉ. चौधरी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना किती तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर आहेत, अशी माहिती विचारली व त्यांना तात्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ आज बैठकीस गैरहजर असलेले कन्नड, गंगापूर, सिल्लोड आणि पैठण या चार तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस जारी केली. शिवाय या चारही गटशिक्षणाधिकाऱ्यांची आजची विनावेतन रजा ग्राह्य धरण्यात आली.