शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

शहरात ३ जानेवारीपर्यंत शाळांना सुटी

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ ...

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. शनिवारी दुपारी प्रशासकांनी हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूट देण्यात आली असली तरी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शहरात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली. शिक्षकांची कोरोना तपासणी, वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तीनच दिवसांत ४०४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळेच शाळा सुरू करायच्या की नाही, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दुपारी घोषणा केली. विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्यास त्यांनी मुभा दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांना दररोज शाळेत यावे लागेल

शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून, ऑनलाईन शिकवणीदेखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असे संकेत शासनाकडूनच देण्यात येत आहेत त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. प्रशासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.