शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३ जानेवारीपर्यंत शाळांना सुटी

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ ...

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. शनिवारी दुपारी प्रशासकांनी हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूट देण्यात आली असली तरी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शहरात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली. शिक्षकांची कोरोना तपासणी, वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तीनच दिवसांत ४०४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळेच शाळा सुरू करायच्या की नाही, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दुपारी घोषणा केली. विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्यास त्यांनी मुभा दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांना दररोज शाळेत यावे लागेल

शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून, ऑनलाईन शिकवणीदेखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असे संकेत शासनाकडूनच देण्यात येत आहेत त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. प्रशासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.