शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

जि़प़ शाळांचा पट घटला; ३९ शिक्षक झाले अतिरिक्त

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे़

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत असून, इंग्रजी शाळा ग्रामीण भागात उघडल्यामुळे त्याचा परिणाम जि़प़ शाळांवर झाला आहे़ गतवर्षी पहिली ते सातवीपर्यंत १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांचा पट होता़ यंदा ९८ हजार ६०० विद्यार्थ्यांचा पट असून यंदा ५ हजार ४०० विद्यार्थ्यांची संख्या जि़प़ शाळांतून कमी झाली आहे़ परिणामी, जिल्ह्यात ३९ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत़लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत़ या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत ९८ हजार ६०० विद्यार्थी असून, गतवर्षी एवढ्याच शाळांमध्ये १ लाख ४ हजार विद्यार्थी होते़ यंदा ५ हजार ४०० विद्यार्थी घटले आहेत़ ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यामुळे जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे़ त्यातच संच मान्यतेबाबतचाही निर्णय नवा आला आहे़ ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण आहे़ ६० विद्यार्थ्यांमागे २ तर ६१ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असे नवीन धोरण आले आहे़ या धोरणामुळेही अतिरिक्त शिक्षक होण्याचे प्रमाण वाढत आहे़ विद्यार्थी संख्या कमी होत आहे़ शिवाय, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यता असे धोरण आल्यामुळे अतिरिक्तचाही घोळ वाढत आहे़ अतिरिक्त शिक्षक होत असले तरी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत़ शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांसाठी वर्ग व तुकडीला २० पट संख्या व शहरासाठी २५ पट संख्या ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ मात्र शासनाने संच मान्यतेचा आदेश मागे घेतलेला नाही़ शिवाय जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत़ त्यामुळे दरवर्षी जि़प़ शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे़ १२३५ शाळांपैकी जवळपास ३० ते ३५ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत़ केवळ विद्यार्थी संख्या रोडावत असल्यामुळे तीन शिक्षक, दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकावर आल्या आहेत़ ज्ञान रचनावादी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत़