शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जि़प़ शाळांचा पट घटला; ३९ शिक्षक झाले अतिरिक्त

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे़

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत असून, इंग्रजी शाळा ग्रामीण भागात उघडल्यामुळे त्याचा परिणाम जि़प़ शाळांवर झाला आहे़ गतवर्षी पहिली ते सातवीपर्यंत १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांचा पट होता़ यंदा ९८ हजार ६०० विद्यार्थ्यांचा पट असून यंदा ५ हजार ४०० विद्यार्थ्यांची संख्या जि़प़ शाळांतून कमी झाली आहे़ परिणामी, जिल्ह्यात ३९ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत़लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत़ या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत ९८ हजार ६०० विद्यार्थी असून, गतवर्षी एवढ्याच शाळांमध्ये १ लाख ४ हजार विद्यार्थी होते़ यंदा ५ हजार ४०० विद्यार्थी घटले आहेत़ ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यामुळे जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे़ त्यातच संच मान्यतेबाबतचाही निर्णय नवा आला आहे़ ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण आहे़ ६० विद्यार्थ्यांमागे २ तर ६१ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असे नवीन धोरण आले आहे़ या धोरणामुळेही अतिरिक्त शिक्षक होण्याचे प्रमाण वाढत आहे़ विद्यार्थी संख्या कमी होत आहे़ शिवाय, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यता असे धोरण आल्यामुळे अतिरिक्तचाही घोळ वाढत आहे़ अतिरिक्त शिक्षक होत असले तरी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत़ शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांसाठी वर्ग व तुकडीला २० पट संख्या व शहरासाठी २५ पट संख्या ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ मात्र शासनाने संच मान्यतेचा आदेश मागे घेतलेला नाही़ शिवाय जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत़ त्यामुळे दरवर्षी जि़प़ शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे़ १२३५ शाळांपैकी जवळपास ३० ते ३५ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत़ केवळ विद्यार्थी संख्या रोडावत असल्यामुळे तीन शिक्षक, दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकावर आल्या आहेत़ ज्ञान रचनावादी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत़