शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़ शाळांचा पट घटला; ३९ शिक्षक झाले अतिरिक्त

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे़

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत असून, इंग्रजी शाळा ग्रामीण भागात उघडल्यामुळे त्याचा परिणाम जि़प़ शाळांवर झाला आहे़ गतवर्षी पहिली ते सातवीपर्यंत १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांचा पट होता़ यंदा ९८ हजार ६०० विद्यार्थ्यांचा पट असून यंदा ५ हजार ४०० विद्यार्थ्यांची संख्या जि़प़ शाळांतून कमी झाली आहे़ परिणामी, जिल्ह्यात ३९ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत़लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत़ या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत ९८ हजार ६०० विद्यार्थी असून, गतवर्षी एवढ्याच शाळांमध्ये १ लाख ४ हजार विद्यार्थी होते़ यंदा ५ हजार ४०० विद्यार्थी घटले आहेत़ ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यामुळे जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे़ त्यातच संच मान्यतेबाबतचाही निर्णय नवा आला आहे़ ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण आहे़ ६० विद्यार्थ्यांमागे २ तर ६१ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असे नवीन धोरण आले आहे़ या धोरणामुळेही अतिरिक्त शिक्षक होण्याचे प्रमाण वाढत आहे़ विद्यार्थी संख्या कमी होत आहे़ शिवाय, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यता असे धोरण आल्यामुळे अतिरिक्तचाही घोळ वाढत आहे़ अतिरिक्त शिक्षक होत असले तरी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत़ शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांसाठी वर्ग व तुकडीला २० पट संख्या व शहरासाठी २५ पट संख्या ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ मात्र शासनाने संच मान्यतेचा आदेश मागे घेतलेला नाही़ शिवाय जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत़ त्यामुळे दरवर्षी जि़प़ शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे़ १२३५ शाळांपैकी जवळपास ३० ते ३५ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत़ केवळ विद्यार्थी संख्या रोडावत असल्यामुळे तीन शिक्षक, दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकावर आल्या आहेत़ ज्ञान रचनावादी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत़