शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

By admin | Updated: March 17, 2016 00:03 IST

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत हिंगोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील ७७४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना आधार दिला जात असून जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी मधील एससी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६०० रूपये याप्रमाणे तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाने दिली. योजनेतंर्गत ६० लक्ष खर्च करण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची रक्कम रहिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुसूचित जातीमधील १६८० विद्यार्थी व २२५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.इंटरनेटमधील तांत्रिक अडचणी मुख्याध्यापकांची डोकेदुखी बनली असून वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनकाडून अर्ज प्रक्रियेच्या तारखेत दरवेळेस बदल केजा जातो. जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यात इंटरनेटच्या सुविधेत वारंवार होणारा बिघाड या विविध अडचणींळे अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची तारीख वारंवार बदलते.