शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

By admin | Updated: March 17, 2016 00:03 IST

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत हिंगोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील ७७४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना आधार दिला जात असून जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी मधील एससी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६०० रूपये याप्रमाणे तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाने दिली. योजनेतंर्गत ६० लक्ष खर्च करण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची रक्कम रहिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुसूचित जातीमधील १६८० विद्यार्थी व २२५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.इंटरनेटमधील तांत्रिक अडचणी मुख्याध्यापकांची डोकेदुखी बनली असून वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनकाडून अर्ज प्रक्रियेच्या तारखेत दरवेळेस बदल केजा जातो. जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यात इंटरनेटच्या सुविधेत वारंवार होणारा बिघाड या विविध अडचणींळे अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची तारीख वारंवार बदलते.