शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रक्ताचा तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:18 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई, मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चलन टंचाई अशा विविध प्रकारच्या टंचाईने नागरिक त्रस्त होते़ मात्र आता रक्ताची टंचाई भेडसावत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ जिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशी रक्तपेढी उभारण्यात आली; परंतु, या रक्तपेढीत रक्तच नसेल तर उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात ५०० रक्त पिशव्यांचा साठा असलेली रक्तपेढी उभारण्यात आली आहे़विशेष म्हणजे या ठिकाणी अद्ययावत असे रक्त विघटन केंद्रही कार्यरत आहे़ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ३० ते ४० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते़ त्यामुळे किमान २५० रक्त पिशव्यांचा साठा रक्तपेढीमध्ये असेल तर तो आठ दिवस पुरु शकतो़ मात्र मागील काही महिन्यांपासून रक्तपेढीतील काही गटांचा रक्तसाठा हा चक्क शून्यावर येऊन ठेपला आहे़ याचा अर्थ रक्ताचा ठणठणाट असलयाने रुग्णांना ऐनवेळी धावपळ करावी लागते़ ठराविक गटाचे रक्त आवश्यक असल्यास नातेवाईक किंवा त्या रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून रक्तदान करावे लागते़ या सर्व परिस्थितीत वेळेचा अपव्यय आणि मन:स्ताप रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़सहा महिन्यांपासून रक्ताचा तुटवडा असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातून रक्तसाठा वाढविण्यासाठी फारसे प्र्रभावी प्रयत्न झाले नाहीत़ त्यामुळे रक्ताच्या साठ्यात ही वाढ झालेली नाही़ सोमवारी घेतलेल्या माहितीनुसार रक्तपेढीमध्ये ए आणि बी या दोन रक्तगटाची एकही रक्त पिशवी शिल्लक नव्हती तर एबी रक्तगटाच्या १५ आणि ओ या रक्तगटाच्या २५ पिशव्या उपलब्ध होत्या़ जिल्हा रुग्णालयात दररोज २५ ते ३० रक्त पिशव्यांची आवश्यकता लागते़ त्या तुलनेत दोन्ही रक्तगटांच्या मिळून ४० रक्त पिशव्या पेढीत उपलब्ध असल्याने रुग्णांना खाजगी रक्तपेढ्यांची दारे ठोठावी लागत आहेत़