शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील २२८ गावांसाठी २२६ विहिरी अधिग्रहन करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावलेली आहे. कमी पावसामुळे या वर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. तसेच काही ठिकाणी धरणेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांमधील २ लाख ९ हजार ८५४ ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या लोकांसाठी प्रशासनाने ११३ टँकरद्वारे २५८ खेपा करून पाणी पुरवठा सुरू केला आहे.जालना तालुक्यातील विरेगाव, सोलगव्हाण, नेर, डुकरी पिंप्री, सेवली, वरखेडा, मोती गव्हाण, एरंडवडगाव या सात गावांत १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५९ गावांसाठी ६१ विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले.बदनापूर तालुक्यात २१ गावे आणि ६ वाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात रोषणगाव, धोपटेश्वर, बदनापूर, दगडवाडी, दुधनवाडी, कडेगाव, वाघु्रळ, बाजार वाहेगाव, देव पिंपळगाव, राजेवाडी, वंजारवाडी, ढोकसाळ, अकोला, भाकरवाडी, मांजरगाव, वरूडी, शेलगाव, वाकुळणी, मेहुणा, चिखली या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांसाठी ४० विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.भोकरदन तालुक्यातील सावरखेडा, तळेगाववाडी, विटा, रामनगर, पिंप्री, पळसखेडा लोणगाव, या पाच गावात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच सात विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. जाफराबाद तालुक्यातील भातोडी, ठोकवाडी, कुंभारी, पापळ, दुनगाव, यागावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच ८ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. परतूर तालुक्यात मागील आठवड्यापर्यंत एकही टँकरर सुरू नव्हते. या आठवड्यात तालुक्यातील सुरूमगाव येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातील १० गावांसाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मंठा तालुक्यातील मंठा शहर, हिवरखेडा, पांगरी गोसावी, कंठाळा, गुलखंड या पाच गावात पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणी उंचेगाव, रवना, राहेरा, राहेरातांडा, बाहिरगाव, शिंदे वडगाव, पांडोळी, देव हिवरा, देवहिवरा वस्ती, देवनगर तांडा, डहाळेगाव, डहाळेगाव तांडा, रांजणी, चित्रवडगाव, भेंडाळा, बोरगाव, बोरगा खुर्द, जांबसमर्र्थ, शिंदखेड तांडा, चित्रवडगाव, बेलगाव, रामगव्हाण खुर्द, या गावांना आणि वाड्यांना २ शासकीय व १६ खाजगी असे १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४८ गावांसाठी ४४५विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)