शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:16 IST

केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रझाकारी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी लढा उभारला होता. या लढ्याला आता मराठवाडा मुक्तिसंग्राम असेही नाव पडत आहे. मात्र, हा मराठवाडा नव्हे तर हैदराबाद मुक्तिसंग्राम होता. एकूण १६ जिल्ह्यांसाठी लढला. आता केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरव समारंभाचे आयोजन नाट्यगृहात केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए . चोपडे, तर प्रा. दिनकर बोरीकर प्रमुख पाहुणे होते. या समारंभात हैदराबाद मुक्तिसंग्रामात उल्लेखनीय कार्य केलेले स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल मंगीलाल गंगवाल आणि नागोराव विठ्ठलराव देशपांडे यांचा कुलगुरूंच्या हस्ते शाल, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा. बोरीकर म्हणाले, कोणत्याही संघटित समाजाचा विकास होत असतो. निजामाच्या विरोधात हैदराबाद संस्थानातील सर्व जाती, धर्मातील लोक संघटित होऊन लढले. यामुळे यश मिळाले. आताही समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचेही प्रा. बोरीकर यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील घटनांना उजाळा दिला. या कार्यक्रमात पन्नालाल मंगीलाल गंगवाल यांनी वाढत्या वयामुळे मनोगत व्यक्त केले नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी नाट्यगृह परिसरात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रकाश आकडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.